Skip to main content

'
उपेक्षेच्या धनी झालेल्या - आदिवासी महिला संशोधक'
या फोटोतल्या बाया तशा दिसायला साध्यासुध्या आहेत. मान्हेरे, आंबेवंगण, पिंपळदरावाडी, कोंभाळणे, एकदरे, खिरविरे या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागातल्या आदिवासी पाड्यांवर त्या वस्तीला असतात. त्यांच्या कार्यकर्तृत्त्वामुळं त्या अलीकडे उजेडात येताय. साध्यासुध्या दिसणाऱ्या या बायांचं असामान्य कर्तृत्व कोणते? ते समजून घ्यायला हवे.
*1)हिराबाई लहू गभाले* या ग्रामीण बँकर आहेत. मान्हेरे येथे त्या राहतात. बचत गटाच्या माध्यमातून शेकडो महिलांना स्वयंरोजगारासाठी भांडवल देत त्यांना पायावर उभे केलेय. कितीतरी कुटुंबांचे स्थलांतर तिने रोखले आहे.
*2)ममताबाई देवराम भांगरे* :-ज्यांच्या सेंद्रीय शेतीतील प्रयोगांनी देशाचे लक्ष वेधलेय त्या देवगावच्या ममताबाई देवराम भांगरे देशाच्या शेती धोरणात ममताबाई यांची केसस्टडी प्रसिद्ध झालीय, यावरुन त्यांच्या भात पिकातील संशोधनाचा अंदाज यावा! आयआयटी, आयआयएममधले प्रोफेसर, विद्यार्थी, धोरणकर्ते इथे येऊन, ममताबाईंकडून व्यवस्थापन आणि संशोधन याचे धडे घेताय! त्यांचं काम समजून घेत अभ्यास करताय.
*3)सोनाबाई विठ्ठल भांगरे* हे पिंपळदरावाडी येथील असेच मुलखावेगळं व्यक्तिमत्त्व! यांना जलतज्ज्ञ कोण म्हणणार कारण त्यांचा रिसर्च पेपर एखाद्या जर्नलमध्ये पब्लिश झालेला नाहीये ना म्हणून! मात्र त्यांचं काम थोर आहे. बाएफ स्वयंसेवी संस्थेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेले बंधारे बघायला देशोदेशीचे लोक येतातय. नैसर्गिक झऱ्यांचा, प्रवाहांचा कोंडलेला, गुदमरलेला श्वास त्यांनी मोकळा केलाय. ते पाणी उताराच्या दिशेनं घरांत आणलंय. केवढं मोठं इनोवेशन आहे हे!
*4)शांताबाई खंडू धांडे* यांचा वेश बावळा आहे. काळ्या आईत कष्ट करताना त्या तिच्याशी एकरूप झालेल्या! यांचं वैशिष्ट्य हे की त्यांच्या आंबेवंगण येथील घराची कौलं दिसत नाहीत. का? तर त्यांच्या परसबागेतल्या वेलींनी छताचा, भिंतीचा ताबा घेतलाय. वर्षभर घरावर, परसात त्या भाजीपाला घेतात, तो पण सेंद्रीय बरं का? रोज रोज ताजी ताजी भाजी! भारीय की नाही? यांची परसबाग आणि 'वेलींचे घर' बघायला तर जगभरातले अभ्यासक, जिज्ञासू येतात! (यांनाही कोणी परसबागतज्ज्ञ म्हणत नाही बरं का!) नाही म्हणू देत त्याने काय फरक पडतो. चिखलात, मातीत पाय रोवून उभी असलेली, वेलींशी घट्ट जैविक नातं असलेल्या शांताबाईंना काहीही फरक पडत नाही... आपलं काम आणि आपण भले, असा त्यांचा एकूण खाक्या दिसतो!
*5)हिराबाई हैबती भांगरे* यांचेही असेच काहीतरी भन्नाट काम आकार घेतेय बरं. एकदरे येथील त्यांच्या वस्तीजवळ भातसंशोधन केंद्र उभे राहतेय. कृषी विद्यापीठातल्या संशोधकाहून अधिक गोष्टी जाणतात या.
*6)राहीबाई पोपेरे* :- रघुनाथ माशेलकर यांनी 'सीडमदर'(बीजमाता) म्हणून ज्यांचा गौरव केलेलाय त्या राही मावशींना तर आपल्यापैकी अनेक लोक ओळखतात! अलीकडे त्या प्रकाशात आल्याय. बीबीसीने गौरवलेल्या जगभरातल्या १०० महिलांत मावशींचा समावेश आहे!त्यांची बियाणे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
*7)पेढेकर मावशी* या फोटोत बिताका या अत्यंत दुर्गम गावातली पेढ़ेकर नामक महिला नाहीये. देशी गायी पाळणाऱ्या या महिलेने दूध आणि खवा विकून कुटुंबासाठी बेगमी केलेली आहे.
या सगळ्याजणी ग्रामीण, आदिवासी भागातल्या खऱ्याखुऱ्या आयडॉल आहेत!
महाराष्ट्राच्या कोपऱ्यात, सह्यगिरीच्या गिरीकंदरात अकोले तालुक्यातील या आदिवासी महिला म्हणजे उपेक्षेच्या धनी आहेत. मात्र वेगळी वाट निर्माण करणारं, त्यांचं काम दुर्लक्षितच राहिलं आहे, याची खंत आहे मनात. अर्थात त्यांना याचं काही पडलेलं नाहीये. जीवन-मरणाच्या संघर्षात हातपाय हलवताना, अभावात जगताना इनोवेशन कसे जन्माला येते, हे राज्याच्या कारभारी मंडळीनी इथे येऊन, बांधावर शेतात बसून समजून घ्यायची गरज आहे. कृषी विद्यापीठातल्या संशोधकांचं संशोधन आम्ही नाकारत नाहीत, मात्र पिढीजात ज्ञान ज्यांच्या जीन्समध्ये, डीएनएमध्ये आहे, ज्यांनी 'करुन दाखवलं' आहे. त्या अंगीकृत कामाकडे धोरणकर्त्यांनी, प्रसारमाध्यमांनी, धुरीणांनी दुर्लक्ष करणे म्हणजे मोठी आत्मवंचना ठरेल. विद्यापीठातले संशोधन आणि शेतातले काम हे ज्ञानाचं राजकारण बाजूला ठेवून निकोप दृष्टीने, डोळे उघडे ठेवून ग्रामीण भागातील संशोधन, इनोवेशन समजून घेऊन धोरणांनाही दिशा द्यायची गरज आहे. अन्यथा तुमच्या शेतीविषयक धोरणांना मातीचा वास कधीही येणार नाही. त्यातून शेती आणि शेतकऱ्यांचं भलं होण्याची शक्यता धुसर वाटते. बाएफ संस्था, या स्वयंसेवी संस्थेतले सर्व जाणते आणि कार्यकर्ते अधिकारी तसेच जितीन साठे यांनी विशेषकरुन या कामाला साथ दिलीय, त्यांच्याविषयी मनातून कृतज्ञ भाव आहेत!
(Post from Tribal India Fb Page)

Comments

Popular posts from this blog

भाग-2  ' सामाजिक उद्योजकता लोककला आणि कलापथक' समाजामध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी कलापथक यांचे अमूल्य योगदान राहिलेले आहे.ते पारंपरिक कला सादर करतात ज्यातून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन होते. आजच्या घडीला सोशल मीडियाच्या वापराने त्याच्या एवढा प्रभाव कोणत्याच माध्यमाचा नाही. बुरसटलेली विचारसरणी, परंपरागत रुढी यांचा  प्रभाव, नवीन विज्ञानवादी गोष्टींचा विचार करण्याची अपरिहार्यता या सर्व गोष्टी पारंपारिक कला पथक प्रभावी पद्धतीने  सादर करण्याचे काम करत आहे. आज भारतात  संडासांची संख्यापेक्षा मोबाईलची  संख्या जास्त आहे.म्हणजे स्वतःच्या स्वच्छतेपेक्षा तांत्रिक गोष्टींचा वापराला जास्त महत्त्व आहे.म्हणूनच या मोबाईलच्या माध्यमातून इतर पश्चिमात्य गोष्टींचा अगदी सहजतेने प्रवेश होत आहे ज्याच्यामुळे आमचा मेंदुसुद्धा  काम करणं बंद झाला आहे. दिसली मोकळी जागा की मुतणार तिथे, थुंकनार तिथे,कचरा पण टाकणार तिथे...मग राहत ते काय? आणि याच गोष्टीमुळे आज  हागण्या-मुतण्यावर ,कचरा ,आणि स्वच्छतेवर या लोकांना प्रबोधन करण्याची वेळ येत आहे. नविन मूल्यांची उपयोगिता,सृजनशीलता , विज्ञानवादी
'  Real Waste Managers ' Few days before I got opportunity to visit  Municipal Solid Waste management unit at Pune .During that visit whatever I observed and experienced that was very pathatic.We so called  'literate ,Modern' Urban community are the major polluter. Because of having  plenty money  and mainting our lavish lifestyle we creates so much hazardous waste unknowingly. And we want to manage that waste by others which was created by us. Who are those 'others'. Those are real  waste managers in society.We are  little bit environmently safe bacause of them only. We so called 'literate community' feel shamed to pronounce words  about waste such as condoms, sanitary napkins ,Diapers in public. Are we ever go through the user and disposal instruction written on it? Yes or No. Irrespective of that  we simply dumped it into dustbins , open spaces,drainage lines.Our this  hazardous,filthy waste will be pick up by any woman, man

Dare to Reduce Big !

  Dare to Reduce Big ! एकीकडे पर्यावरण प्रेमींनी माझी वसुंधरा वाचवण्यासाठी धडपड करायची,प्लास्टिक बंदी मोहीम चालवायची, नगरपालिका, महानगरपालिकांनी कसोशीने प्रयत्न करायचे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हीच प्लास्टिक चा वापर वाढवायचा ! लोकमत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत पळणार स्पर्धक, घाण करणार स्पर्धक, प्रेक्षक व आयोजक ! आणि साफ कोणी करायचं, तर  सफाई कर्मचाऱ्यांनी. वाह रे वाह !   थोडं तरी सुधारा ! आमच चांगलं लक्ष आहे ! टीप: स्पर्धेच्या आयोजनात कचरा होणार ,प्लास्टिक चा वापर वाढणार हे माहीत असताना देखील कचरा व्यवस्थापन करण्याचा आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा शहाणपण दाखवावं. मॅरेथॉन मध्ये प्लास्टिक बंदीच्या  आणि कचरा व्यवस्थापनाच्या सूचना दर्शवा, कचऱ्याचे प्रमाण कमी होईल. फोटो मध्ये दाखवलेल्या एका बॉक्स मध्ये 24 बाटल्या आहेत आणि तिथे किमान  60 बॉक्स  ठेवून आहेत. तर   एका कार्यक्रमात  त्या ठिकाणी 1440 प्लास्टिक बाटल्यांचा कचरा निर्माण होणार. आता संपूर्ण मॅरेथॉन मध्ये किती ठिकाणी असे वॉटर स्टेशन असतील त्यावरून गणित करता येईल. P.C.-Vivek Shinde #प्लास्टिकचावापरटाळा #माझा कचरा_माझी जबाबदारी #स्वच्छ_पर्याव