Skip to main content




' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास '
तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार?
माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत.
आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत!
शिक्षण हे सर्वांसाठी सहज योग्य उपलब्ध असणारे प्रत्येकाच्या खिशाला परवडणारे  साधन असले पाहिजे.मूलभूत शिक्षण कायद्याअंतर्गत मोफत शिक्षणाची सक्तीच्या कायद्याची अंमलबजावणी तर होतेय पण गुणवत्ता आणि संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे.शिक्षणासारख्या क्षेत्राचे खाजगीकरण होत असताना सरकारी शाळांकडे होणारे दुर्लक्ष हेच शिक्षणाचा दर्जा घसरण होण्याचे दर्शक ठरतंय.मी पाहतोय अनुभवतोय की, शाळांत संकल्पनाआधारित शिक्षणाची नेहमीच वानवा भासलेली आहे. मागील महिन्यात माझ संशोधनकार्य करण्यासाठी मी  चंद्रपूर येथे गेलो होतो. तेथील संशोधनाअंती नोंदवलेल्या निरीक्षणांपैकी दोन निरीक्षणे महत्त्वाची आहेत.ती ही आहेत की ,प्रत्येक घरातून प्रति वर्षी साधारण एक किलोपेक्षा लोखंड अथवा तत्सम वस्तू आणि कमीत कमी एक तेलाचा डबा स्क्रॅप म्हणून निर्माण होतो. आता तुम्हाला वाटेल की या निरीक्षणांचा याठिकाणी काय संबंध? हो संबंध आहे म्हणूनच  त्याचा मी संदर्भ दिला आहे. स्वच्छता आणि घन कचराव्यवस्थापन  हे शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी कशापद्धतीने फायद्याचे ठरू शकते याचे सर्वोत्तम उदाहरण वरील निरीक्षणात देतात. IGNITED MINDS हा उपक्रम याचे सार्थ उदाहरण आहे.हा उपक्रम अशापद्धतीच्या लोखंड आणि तेलाच्या डब्याचा पुनर्वापर करून शैक्षणिक सुधारणा आणि शिक्षणासहित्याच्या निर्मितीसाठी करतो. वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळी व्यवस्थापन ,पोषण, विज्ञान ,गणित ,भूगोल, मूल्यशिक्षण ,इंग्रजी, मराठी अंगणवाडी साठी मूल्याधारित खेळसाहित्य आणि शिक्षणसाहित्याची उपलब्धता ही या घनकचऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 48 वेगवेगळे मॉडेल्स आणि अंगणवाडीसाठी पंधरा वेगवेगळी मॉडेल्स आधारित हा उपक्रम बनविला गेला आहे .तेलाचे डबे आणि लोखंड यावर पुनर्वापर प्रक्रिया करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची साधने तेथील विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. परिणामी सरकारी शाळांकडे पाहण्याचा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन यामध्ये नक्कीच बदल होण्यास मदत होणार आहे .इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे सर्व मॉडेल्स माहितीसाठी उपलब्ध आहेत. शाळेच्या सर्व गरजांची योग्य अभ्यास करून त्यांची पूर्तता करून शाळाबाह्य स्वरूप आकर्षक करण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास देखील होण्यास याची मदत होईल.

सायन्स पार्क या संकल्पनेवर आधारित भारतातील काही मेट्रो सिटीमध्ये काही मॉडेल्स उभारले आहेत.परंतु या विज्ञान संकल्पनेवर आधारित  घनकचरा व्यवस्थापनातून सरकारी शाळांमध्ये सायन्स पार्क सारख्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलांना सायन्स पार्क पाहण्यासाठी आता कुठल्याही मेट्रो सिटी मध्ये जाण्याची गरज नाही. ते सायन्स पार्क ,शिक्षण बगीच्या आता ग्रामीण भागातच सरकारी शाळांमध्ये उपलब्ध करता येत आहेत. ज्याप्रमाणे अॅग्रो टुरिझम, मेडिकल टुरिझम सारख्या गोष्टी जम बसवू लागल्या आहेत त्याच पद्धतीने शिक्षणातील मॉडेल म्हणून ' एज्युकेशन टुरिझम ' ही संकल्पना भविष्यात उदयास आली तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.
-अतुल संगीता आत्माराम
9527544478
Email- atularaut1992@gmail.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Chapter 1: Understanding Nutrition #Nutrition is an integral component of every individuals life. Even lifestyle decides nutritional development in individuals life.We team of Ignited minds starts to exploring  rural India and will brings you various things in society about nutrition. Stay tuned for next chapter.

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. #आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय. कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे. महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या ...

'मी सक्षम'

रसिका! Ignited Minds चा पडद्यामागील व्यक्तिमत्व! अगदी सुरुवातीच्या काळापासून बोलण्यातून कमी आणि शब्दातून जास्त व्यक्त होणारी व्यक्ती! तिची 'स्व' ला घेऊन महि ला सशक्तीकरणाची कविता. बोलायचय मला मनमोकळ हसायचे मला खळखळून अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारख वहायचे मला भरभरुन तोडायचीत सर्व बंधने जगायचं मला निर्भयाने उडायच मला मनसोक्त त्या उंचावरच्या गरुडा प्रमाणे उन्हातल्या  सावलीत विसावयचं मनाचा डोहात पोहयचं या नभाचा गाभाऱ्यात बिंधास्त रान पाखाराप्रमान भिरभिरायचं गाण्यातील सुराप्रमाने नाचायचं कवितेचा शब्दात रुजायचं या असाह्य जगात वावरताना मला फक्त स्वतःच बनायचं                         - रसिका ननवरे