Skip to main content

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

#आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय.

कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे.
महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या  यंत्रणावरती खर्च होत आहे. जागतिक बँक तसेच केंद्र सरकारच्या वतीने होत असलेल्या आर्थिक मदतीने या परिस्थितीमध्ये सकारात्मक गोष्टी दिसून येत आहेत. सर्व यंत्रणांचे लक्ष केवळ कोरोना या आजारावर असताना इतर संपूर्ण  आर्थिक बाजूंवर महाराष्ट्राला आणि भारताला लक्ष देणं शक्य नाही. लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालला असून,आरोग्य यंत्रणांवर देखील ताण वाढत आहे.

सद्य परिस्थितीमध्ये आरोग्ययंत्रणा यांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक पुढे येत आहे . त्यापैकीच एक नवोपक्रम म्हणावं असा कोरोना  या रोगावर  मात करण्यासाठी चंद्रपूर येथील पोंभुर्णा तालुक्यातील  दिघोरी गावातील बचत गटाने पुढाकार घेतला आहे. आर्थिक बाजू मजबूत करण्यासोबतच  कोरोना रोगाविषयी समाजामध्ये मास्क बनवून ते अल्प दरामध्ये विकून ते वापरण्याबद्दल जनजागृती करण्याचे काम दिघोरितील हे बचत गट करत आहे.
गावामध्ये काम करणारे ग्रामपरिवर्तक श्री.रवी  आहिरे यांच्या मार्गदर्शनातून  गावातील लोकांना अल्प किमतीमध्ये चांगल्या दर्जाचे मास्क बनवून देणे त्यासोबतच त्याबाबत जनजागृती करण्याचा विचार बचत गटाच्या सदस्यांनी बोलून दाखवला आणि सुरू झाला हा अनोखा प्रवास.
गावातील 4 महिला बचत गट एकत्र आले. अंबिका,गौरी,जय अंबे आणि लक्ष्मी माता महिला बचत गटाच्या सदस्यांनी एकत्र येवुन मास्क बनविण्यास तयार असल्याचं   सांगितले आणि लागलीच काम सुरू झाले. महाराष्ट्र ग्रामीण जीनोन्नती तालुका अभियान कक्षाकडून देखील याची दखल घेऊन त्यांनी या बचत गटाला कापड पुरविणे आणि त्याचे शेजारील गावात विक्री व्यवस्थापनासाठी सहकार्य लाभले.कोणत्याही गुंतवणुकीशिवाय  केवळ काही दिवसात 4 महिला गटातील सदस्यांनी मिळून 1800 मास्क बनवून ते   विकले.त्यापैकी 530 मास्क हे गावातच विकले गेले. हाती काहीही नसताना केवळ आत्मविश्वास आणि जिद्दीच्या
जोरावर या महिलांनी चांगली सुरुवात केली.सध्या उमेद मार्फत विक्री व्यवस्थापनासाठी काम चालू आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे मास्क कसे बनवावे याबाबतचे तांत्रिक मार्गदर्शन आनंदवन येथील व्यवस्थापकीय संचालक डॉ.शीतल आमटे यांनी केले.
मंगला सोनटक्के या उपक्रमाविषयी बोलताना सांगतात की," या कठीण दिवसात  उपजिविकेसाठी काय करावे हा मोठा प्रश्न होता. परंतु मास्क बनवून देण्यामुळे घरात बसून रोजगार उपलब्ध झाला आहेच त्याबरोबरच कोरोना रोगाशी लढण्याचं आणि जनजागृती करण्याचं देखील काम करत आहे."
श्री.रवी अहिरे  जे दिघोरी ग्रामपंचायत येथे ग्रामपरीवर्तक म्हणून काम करतात. ते बोलताना सांगतात की,"महिला बचत गटाकडून चालवले जाणारे हे काम आणि  त्यांची जिद्द खरंच कौतुकास्पद आहे."
उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक श्री. सराळे सर आणि ग्रामपरीवर्तक श्री.रवी अहिरे यांच्या मार्गदर्शनातून सुरू झालेलं हा नवोपक्रम आजच्या कठीण प्रसंगात बचत गटाच्या महिलांच्या जिद्दिमुळे आणि चिकाटीमूळे 10-12  घरांना  आर्थिक  उभारी देऊन त्यांना सक्षम करत आहे. सदर उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी श्री.रवी अहिरे,9422448281 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
शब्दांकन-
अतुल संगीता आत्माराम.
9527544478




Comments

  1. हे प्रेरणा आणि बळ देणारं काम आहे. संकटाच्या काळात मोलाचे योगदान ठरणार आहे. अभिनंदन ग्राम परिवर्तक रवी अहिरे आणि सर्व बचत गटातील महिला यांचे आभार.

    ReplyDelete
  2. खूपच प्रेरणादायी उपक्रम...स्वतःच्या उपजीविकासोबतच समाजाची खूप चांगल्या प्रकारे सेवा घडत आहे.

    ReplyDelete
  3. हे खरोखर छान आहे ... सर्व शुभेच्छा ❤

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Chapter 1: Understanding Nutrition #Nutrition is an integral component of every individuals life. Even lifestyle decides nutritional development in individuals life.We team of Ignited minds starts to exploring  rural India and will brings you various things in society about nutrition. Stay tuned for next chapter.

'मी सक्षम'

रसिका! Ignited Minds चा पडद्यामागील व्यक्तिमत्व! अगदी सुरुवातीच्या काळापासून बोलण्यातून कमी आणि शब्दातून जास्त व्यक्त होणारी व्यक्ती! तिची 'स्व' ला घेऊन महि ला सशक्तीकरणाची कविता. बोलायचय मला मनमोकळ हसायचे मला खळखळून अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारख वहायचे मला भरभरुन तोडायचीत सर्व बंधने जगायचं मला निर्भयाने उडायच मला मनसोक्त त्या उंचावरच्या गरुडा प्रमाणे उन्हातल्या  सावलीत विसावयचं मनाचा डोहात पोहयचं या नभाचा गाभाऱ्यात बिंधास्त रान पाखाराप्रमान भिरभिरायचं गाण्यातील सुराप्रमाने नाचायचं कवितेचा शब्दात रुजायचं या असाह्य जगात वावरताना मला फक्त स्वतःच बनायचं                         - रसिका ननवरे