Skip to main content

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

#आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय.

कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे.
महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या  यंत्रणावरती खर्च होत आहे. जागतिक बँक तसेच केंद्र सरकारच्या वतीने होत असलेल्या आर्थिक मदतीने या परिस्थितीमध्ये सकारात्मक गोष्टी दिसून येत आहेत. सर्व यंत्रणांचे लक्ष केवळ कोरोना या आजारावर असताना इतर संपूर्ण  आर्थिक बाजूंवर महाराष्ट्राला आणि भारताला लक्ष देणं शक्य नाही. लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालला असून,आरोग्य यंत्रणांवर देखील ताण वाढत आहे.

सद्य परिस्थितीमध्ये आरोग्ययंत्रणा यांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक पुढे येत आहे . त्यापैकीच एक नवोपक्रम म्हणावं असा कोरोना  या रोगावर  मात करण्यासाठी चंद्रपूर येथील पोंभुर्णा तालुक्यातील  दिघोरी गावातील बचत गटाने पुढाकार घेतला आहे. आर्थिक बाजू मजबूत करण्यासोबतच  कोरोना रोगाविषयी समाजामध्ये मास्क बनवून ते अल्प दरामध्ये विकून ते वापरण्याबद्दल जनजागृती करण्याचे काम दिघोरितील हे बचत गट करत आहे.
गावामध्ये काम करणारे ग्रामपरिवर्तक श्री.रवी  आहिरे यांच्या मार्गदर्शनातून  गावातील लोकांना अल्प किमतीमध्ये चांगल्या दर्जाचे मास्क बनवून देणे त्यासोबतच त्याबाबत जनजागृती करण्याचा विचार बचत गटाच्या सदस्यांनी बोलून दाखवला आणि सुरू झाला हा अनोखा प्रवास.
गावातील 4 महिला बचत गट एकत्र आले. अंबिका,गौरी,जय अंबे आणि लक्ष्मी माता महिला बचत गटाच्या सदस्यांनी एकत्र येवुन मास्क बनविण्यास तयार असल्याचं   सांगितले आणि लागलीच काम सुरू झाले. महाराष्ट्र ग्रामीण जीनोन्नती तालुका अभियान कक्षाकडून देखील याची दखल घेऊन त्यांनी या बचत गटाला कापड पुरविणे आणि त्याचे शेजारील गावात विक्री व्यवस्थापनासाठी सहकार्य लाभले.कोणत्याही गुंतवणुकीशिवाय  केवळ काही दिवसात 4 महिला गटातील सदस्यांनी मिळून 1800 मास्क बनवून ते   विकले.त्यापैकी 530 मास्क हे गावातच विकले गेले. हाती काहीही नसताना केवळ आत्मविश्वास आणि जिद्दीच्या
जोरावर या महिलांनी चांगली सुरुवात केली.सध्या उमेद मार्फत विक्री व्यवस्थापनासाठी काम चालू आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे मास्क कसे बनवावे याबाबतचे तांत्रिक मार्गदर्शन आनंदवन येथील व्यवस्थापकीय संचालक डॉ.शीतल आमटे यांनी केले.
मंगला सोनटक्के या उपक्रमाविषयी बोलताना सांगतात की," या कठीण दिवसात  उपजिविकेसाठी काय करावे हा मोठा प्रश्न होता. परंतु मास्क बनवून देण्यामुळे घरात बसून रोजगार उपलब्ध झाला आहेच त्याबरोबरच कोरोना रोगाशी लढण्याचं आणि जनजागृती करण्याचं देखील काम करत आहे."
श्री.रवी अहिरे  जे दिघोरी ग्रामपंचायत येथे ग्रामपरीवर्तक म्हणून काम करतात. ते बोलताना सांगतात की,"महिला बचत गटाकडून चालवले जाणारे हे काम आणि  त्यांची जिद्द खरंच कौतुकास्पद आहे."
उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक श्री. सराळे सर आणि ग्रामपरीवर्तक श्री.रवी अहिरे यांच्या मार्गदर्शनातून सुरू झालेलं हा नवोपक्रम आजच्या कठीण प्रसंगात बचत गटाच्या महिलांच्या जिद्दिमुळे आणि चिकाटीमूळे 10-12  घरांना  आर्थिक  उभारी देऊन त्यांना सक्षम करत आहे. सदर उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी श्री.रवी अहिरे,9422448281 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
शब्दांकन-
अतुल संगीता आत्माराम.
9527544478




Comments

  1. हे प्रेरणा आणि बळ देणारं काम आहे. संकटाच्या काळात मोलाचे योगदान ठरणार आहे. अभिनंदन ग्राम परिवर्तक रवी अहिरे आणि सर्व बचत गटातील महिला यांचे आभार.

    ReplyDelete
  2. खूपच प्रेरणादायी उपक्रम...स्वतःच्या उपजीविकासोबतच समाजाची खूप चांगल्या प्रकारे सेवा घडत आहे.

    ReplyDelete
  3. हे खरोखर छान आहे ... सर्व शुभेच्छा ❤

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भाग-2  ' सामाजिक उद्योजकता लोककला आणि कलापथक' समाजामध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी कलापथक यांचे अमूल्य योगदान राहिलेले आहे.ते पारंपरिक कला सादर करतात ज्यातून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन होते. आजच्या घडीला सोशल मीडियाच्या वापराने त्याच्या एवढा प्रभाव कोणत्याच माध्यमाचा नाही. बुरसटलेली विचारसरणी, परंपरागत रुढी यांचा  प्रभाव, नवीन विज्ञानवादी गोष्टींचा विचार करण्याची अपरिहार्यता या सर्व गोष्टी पारंपारिक कला पथक प्रभावी पद्धतीने  सादर करण्याचे काम करत आहे. आज भारतात  संडासांची संख्यापेक्षा मोबाईलची  संख्या जास्त आहे.म्हणजे स्वतःच्या स्वच्छतेपेक्षा तांत्रिक गोष्टींचा वापराला जास्त महत्त्व आहे.म्हणूनच या मोबाईलच्या माध्यमातून इतर पश्चिमात्य गोष्टींचा अगदी सहजतेने प्रवेश होत आहे ज्याच्यामुळे आमचा मेंदुसुद्धा  काम करणं बंद झाला आहे. दिसली मोकळी जागा की मुतणार तिथे, थुंकनार तिथे,कचरा पण टाकणार तिथे...मग राहत ते काय? आणि याच गोष्टीमुळे आज  हागण्या-मुतण्यावर ,कचरा ,आणि स्वच्छतेवर या लोकांना प्रबोधन करण्याची वेळ येत आहे. नविन मूल्यांची उपयोगिता,सृजनशीलता , विज्ञानवादी
'  Real Waste Managers ' Few days before I got opportunity to visit  Municipal Solid Waste management unit at Pune .During that visit whatever I observed and experienced that was very pathatic.We so called  'literate ,Modern' Urban community are the major polluter. Because of having  plenty money  and mainting our lavish lifestyle we creates so much hazardous waste unknowingly. And we want to manage that waste by others which was created by us. Who are those 'others'. Those are real  waste managers in society.We are  little bit environmently safe bacause of them only. We so called 'literate community' feel shamed to pronounce words  about waste such as condoms, sanitary napkins ,Diapers in public. Are we ever go through the user and disposal instruction written on it? Yes or No. Irrespective of that  we simply dumped it into dustbins , open spaces,drainage lines.Our this  hazardous,filthy waste will be pick up by any woman, man

Dare to Reduce Big !

  Dare to Reduce Big ! एकीकडे पर्यावरण प्रेमींनी माझी वसुंधरा वाचवण्यासाठी धडपड करायची,प्लास्टिक बंदी मोहीम चालवायची, नगरपालिका, महानगरपालिकांनी कसोशीने प्रयत्न करायचे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हीच प्लास्टिक चा वापर वाढवायचा ! लोकमत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत पळणार स्पर्धक, घाण करणार स्पर्धक, प्रेक्षक व आयोजक ! आणि साफ कोणी करायचं, तर  सफाई कर्मचाऱ्यांनी. वाह रे वाह !   थोडं तरी सुधारा ! आमच चांगलं लक्ष आहे ! टीप: स्पर्धेच्या आयोजनात कचरा होणार ,प्लास्टिक चा वापर वाढणार हे माहीत असताना देखील कचरा व्यवस्थापन करण्याचा आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा शहाणपण दाखवावं. मॅरेथॉन मध्ये प्लास्टिक बंदीच्या  आणि कचरा व्यवस्थापनाच्या सूचना दर्शवा, कचऱ्याचे प्रमाण कमी होईल. फोटो मध्ये दाखवलेल्या एका बॉक्स मध्ये 24 बाटल्या आहेत आणि तिथे किमान  60 बॉक्स  ठेवून आहेत. तर   एका कार्यक्रमात  त्या ठिकाणी 1440 प्लास्टिक बाटल्यांचा कचरा निर्माण होणार. आता संपूर्ण मॅरेथॉन मध्ये किती ठिकाणी असे वॉटर स्टेशन असतील त्यावरून गणित करता येईल. P.C.-Vivek Shinde #प्लास्टिकचावापरटाळा #माझा कचरा_माझी जबाबदारी #स्वच्छ_पर्याव