Skip to main content
भाग-2
 ' सामाजिक उद्योजकता लोककला आणि कलापथक'

समाजामध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी कलापथक यांचे अमूल्य योगदान राहिलेले आहे.ते पारंपरिक कला सादर करतात ज्यातून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन होते. आजच्या घडीला सोशल मीडियाच्या वापराने त्याच्या एवढा प्रभाव कोणत्याच माध्यमाचा नाही. बुरसटलेली विचारसरणी, परंपरागत रुढी यांचा  प्रभाव, नवीन विज्ञानवादी गोष्टींचा विचार करण्याची अपरिहार्यता या सर्व गोष्टी पारंपारिक कला पथक प्रभावी पद्धतीने  सादर करण्याचे काम करत आहे.
आज भारतात  संडासांची संख्यापेक्षा मोबाईलची  संख्या जास्त आहे.म्हणजे स्वतःच्या स्वच्छतेपेक्षा तांत्रिक गोष्टींचा वापराला जास्त महत्त्व आहे.म्हणूनच या मोबाईलच्या माध्यमातून इतर पश्चिमात्य गोष्टींचा अगदी सहजतेने प्रवेश होत आहे ज्याच्यामुळे आमचा मेंदुसुद्धा  काम करणं बंद झाला आहे. दिसली मोकळी जागा की मुतणार तिथे, थुंकनार तिथे,कचरा पण टाकणार तिथे...मग राहत ते काय?
आणि याच गोष्टीमुळे आज  हागण्या-मुतण्यावर ,कचरा ,आणि स्वच्छतेवर या लोकांना प्रबोधन करण्याची वेळ येत आहे.
नविन मूल्यांची उपयोगिता,सृजनशीलता , विज्ञानवादी दृष्टिकोन पसरवण्यातून लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे काम करतात . सामाजिक   उद्योजकतेच्या चौकटीमध्ये अगदी तंतोतंत बसणारी , ही कलापथके आहेत. महाराष्ट्राचा पारंपारिक लोकाकलेत तमाशा मधील  'वगा' द्वारे  वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर भाष्य केलं जातं. 'भारुड' हा प्रकार देखील सामाजिक वैचारिकता प्रगल्भ करतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये पहाटेच गाणी म्हणत गावांमधून फिरणारा वासुदेव हा अध्यात्मिक,  सामाजिक गीतांमधून प्रबोधन करत असतो.आणि जो व्यक्ती ती गाणी ऐकतो साहजिकच त्यावर विचार करत राहतो.
पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव जसजसा वाढत गेला तसतशी भारतीय संस्कृतीची लक्तरे वेशीवर टांगली गेली.लोककलांचा वारसा लुप्त होत चालला. लोककला माध्यमातून समाज प्रबोधन कमी झालं.  लोककलांमध्ये पश्चिमात्य पद्धतीचा शिरकाव झाला आणि सगळंच रिमिक्स व्हायला लागल. काळानुसार बदल करणे योग्यच आहे परंतु तो बदल त्या विषयीच्या संस्कृतीच्या नितीमुल्ल्यांमध्ये  बदल करणारा नसावा .लोककलांचा विकास करून स्वतःचे पोट भरणारा आणि स्वतःची आर्थिक गणिते सांभाळणारा एक वर्ग अस्तित्वात आहे याच भान ठेवावं.पारंपरिक कर्यशैलीत बदल करून काळानुरूप आपल्या सामाजिक उद्योजक मध्ये बदल करून मूलभूत तत्त्वांची पायमल्ली न करता या कलापथकांनी कार्य करावे.केवळ इलेक्शन अथवा सरकारी निमसरकारी कार्यालयासाठी काम न करता शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण आणि जागरूकता निर्माण होण्यासाठी या कलापथकांनी काम करणं महत्त्वाचं ठरेल.
' राष्ट्रीय ग्राम विकास संस्था आणि पंचायत राज' हैदराबाद मध्ये आज पाणी, स्वच्छता ,आरोग्य व्यवस्थापन या विषयावर समाज प्रबोधन करणाऱ्या ग्रुपला/ कलापथकला ऐकायला मिळालं. समाजप्रबोधन तेलुगु भाषेमधून असलं तरी चेहऱ्यावरील अविर्भाव आणि जोश यामधून जो संदेश द्यायचा होता तो त्यांनी अगदी सहजरीत्या दिला. आम्ही सर्वांनी देखील अगदी लीलया तो समजावून घेतला.यासाठी आम्हाला ती भाषा येण्याची गरजदेखील भासली नाही.
कलापथकांमधून  दिला जाणारा प्रत्येक संदेश हा समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या भल्यासाठीच आहे.आज आपल्या प्रत्येकाचीच या कलापथकांना  जपण्याची आणि त्यांना समृद्ध करण्याची भूमिका असायला हवीय आणि मला खात्री आहे ती राहील.एक सामाजिक उद्योजकतेचे नवीन स्वरूप म्हणून भविष्यात ते पूर्ण नावारूपास येतील ही सदिच्छा!
-अतुल संगीता आत्माराम.
9527544478

Comments

Popular posts from this blog

Chapter 1: Understanding Nutrition #Nutrition is an integral component of every individuals life. Even lifestyle decides nutritional development in individuals life.We team of Ignited minds starts to exploring  rural India and will brings you various things in society about nutrition. Stay tuned for next chapter.

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. #आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय. कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे. महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या ...

'मी सक्षम'

रसिका! Ignited Minds चा पडद्यामागील व्यक्तिमत्व! अगदी सुरुवातीच्या काळापासून बोलण्यातून कमी आणि शब्दातून जास्त व्यक्त होणारी व्यक्ती! तिची 'स्व' ला घेऊन महि ला सशक्तीकरणाची कविता. बोलायचय मला मनमोकळ हसायचे मला खळखळून अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारख वहायचे मला भरभरुन तोडायचीत सर्व बंधने जगायचं मला निर्भयाने उडायच मला मनसोक्त त्या उंचावरच्या गरुडा प्रमाणे उन्हातल्या  सावलीत विसावयचं मनाचा डोहात पोहयचं या नभाचा गाभाऱ्यात बिंधास्त रान पाखाराप्रमान भिरभिरायचं गाण्यातील सुराप्रमाने नाचायचं कवितेचा शब्दात रुजायचं या असाह्य जगात वावरताना मला फक्त स्वतःच बनायचं                         - रसिका ननवरे