Skip to main content
Field Diary':
कथा परिवर्तनाची:
'आदर्शगाव राजगड'
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुल तालुक्यापासून  २५ किमी अंतरावर असलेलं राजगड हे गाव.गावाला प्राचीन काळापासूनच ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.राजगड म्हणजे गेडाम राजाची भूमी.आजही त्या राजवटीच्या अस्तित्वाच्या खुणा पाहायला मिळतात.चंद्रपूर चे आत्राम राजे आणि  राजगड चे गेडाम राजे हे दोन राजघराणे. चंद्रपूर च राजा शक्तीने बलशाली असल्याने त्याने काही काळातच राजगडच्या गेडाम राजाचा पराभव केला.
गावामध्ये  मामा तलावात असणारे हेमाडपंथी मंदिर गावाच्या ऐतिहासिक वैभवात अजुनच शोभा आणते.
सौ.हजारे या इथल्या सध्याच्या सरपंच.गावाच्या इतिहासात एकदा अपवाद वगळता २००० सालापासून  बिनविरोध निवडणूक होत आहे.२००२ २००३  मध्ये गावाला  स्वच्छतेसाठी महाराष्ट्र राज्याच निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला.त्यानंतर पुन्हा २०१६मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला.ग्रामपंचायत मध्ये ग्रामसांसद हॉल मध्ये  आतापर्यंत मिळालेलं सगळे पुरस्कार ठेवून आहेत.ते गावाच्या अभिमान वाढवतातच.आता आपण बोलुयात स्वच्छतेविषयी.गावामध्ये मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायत पर्यंत पोचण्यासाठी साधारण १.५ ते २ किमीच्या रस्त्यामध्ये दुतर्फा झाडे आहेत आणि कागदच एक तुकडासुध्दा नजरेस पडणार नाही.जागोजागी सार्वजनिक कचराकुंडी बसविल्या आहेत. सांडपाण्याची व्यवस्था अगदी उत्तम रित्या केलेली आहे.गावामध्ये तंबाखू,गुटखा,सुपारी आणि दारू बंदी आहे.गावामध्ये बचत गटाच्या महिलांकडून,युवक मंडळांकडून आणि शेतकऱ्याकडून नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम चालू राहतात.गावाची १००% कर वसुली आहे.
कचरा व्यवस्थापनासाठी आदर्श घ्यावं असे हे आदर्श राजगड. गावातील प्रत्येक कुटुंबं हे आपला घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवत पर्यायानं संपूर्ण गाव स्वच्छ राहत हा अगदी साधा सोपा नियम.इतक्या साध्या आणि सोप्या नियमावर संपूर्ण गाव स्वच्छतेचे आदर्श उदाहरण बनले आहे.घरगुती स्तरावर कचरा व्यवस्थापनाचा कोणताच प्रश्न नाही. सार्वजनिक स्तरावर कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत ने जागोजागी कचराकुंड्या बसविल्या आहेत.तसेच घंटागाडीतून कचरा गोळा करून तो ग्रामपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये नेला जातो.तिथे प्लास्टिक,धातू,कागदी/कापडी अशा पद्धतीने त्याचे वर्गीकरण केले जाते.त्याचं प्रकल्पामध्ये गांडूळ खत आणि कंपोस्ट खताचा प्रकल्प आहे.गावातील जमा होणाऱ्या कचऱ्यावर व्यवस्थापन करून त्यापासून गांडूळ खत,कंपोस्ट खत बनविले जाते.जी जागा काही वर्षांपूर्वी अस्वच्छतेचे भरलेली होती ती जागा आता ऑक्सिजन पार्कमध्ये /शोभिवंत बगीच्यामध्ये रूपांतरित झालेली आहे .एकंदरीतच प्रत्येक गावाने आणि जे कोणी कचरा व्यवस्थापनावर कार्य करत आहेत संशोधन करत आहेत त्यांनी एकदा तरी  या गावाला भेट द्यावी.
(विशेष सहकार्य: रोशन आलम,संगणक परिचालक,ग्रामपंचायत राजगड ,तालुका-मुल, जिल्हा-चंद्रपूर.
प्रेम कासदेकर,रवी अहिरे मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक)
- अतुल संगीता आत्माराम
9527544478


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Chapter 1: Understanding Nutrition #Nutrition is an integral component of every individuals life. Even lifestyle decides nutritional development in individuals life.We team of Ignited minds starts to exploring  rural India and will brings you various things in society about nutrition. Stay tuned for next chapter.

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. #आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय. कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे. महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या ...

'मी सक्षम'

रसिका! Ignited Minds चा पडद्यामागील व्यक्तिमत्व! अगदी सुरुवातीच्या काळापासून बोलण्यातून कमी आणि शब्दातून जास्त व्यक्त होणारी व्यक्ती! तिची 'स्व' ला घेऊन महि ला सशक्तीकरणाची कविता. बोलायचय मला मनमोकळ हसायचे मला खळखळून अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारख वहायचे मला भरभरुन तोडायचीत सर्व बंधने जगायचं मला निर्भयाने उडायच मला मनसोक्त त्या उंचावरच्या गरुडा प्रमाणे उन्हातल्या  सावलीत विसावयचं मनाचा डोहात पोहयचं या नभाचा गाभाऱ्यात बिंधास्त रान पाखाराप्रमान भिरभिरायचं गाण्यातील सुराप्रमाने नाचायचं कवितेचा शब्दात रुजायचं या असाह्य जगात वावरताना मला फक्त स्वतःच बनायचं                         - रसिका ननवरे