Field Diary':
कथा परिवर्तनाची:
'आदर्शगाव राजगड'
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुल तालुक्यापासून २५ किमी अंतरावर असलेलं राजगड हे गाव.गावाला प्राचीन काळापासूनच ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.राजगड म्हणजे गेडाम राजाची भूमी.आजही त्या राजवटीच्या अस्तित्वाच्या खुणा पाहायला मिळतात.चंद्रपूर चे आत्राम राजे आणि राजगड चे गेडाम राजे हे दोन राजघराणे. चंद्रपूर च राजा शक्तीने बलशाली असल्याने त्याने काही काळातच राजगडच्या गेडाम राजाचा पराभव केला.
गावामध्ये मामा तलावात असणारे हेमाडपंथी मंदिर गावाच्या ऐतिहासिक वैभवात अजुनच शोभा आणते.
सौ.हजारे या इथल्या सध्याच्या सरपंच.गावाच्या इतिहासात एकदा अपवाद वगळता २००० सालापासून बिनविरोध निवडणूक होत आहे.२००२ २००३ मध्ये गावाला स्वच्छतेसाठी महाराष्ट्र राज्याच निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला.त्यानंतर पुन्हा २०१६मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला.ग्रामपंचायत मध्ये ग्रामसांसद हॉल मध्ये आतापर्यंत मिळालेलं सगळे पुरस्कार ठेवून आहेत.ते गावाच्या अभिमान वाढवतातच.आता आपण बोलुयात स्वच्छतेविषयी.गावामध्ये मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायत पर्यंत पोचण्यासाठी साधारण १.५ ते २ किमीच्या रस्त्यामध्ये दुतर्फा झाडे आहेत आणि कागदच एक तुकडासुध्दा नजरेस पडणार नाही.जागोजागी सार्वजनिक कचराकुंडी बसविल्या आहेत. सांडपाण्याची व्यवस्था अगदी उत्तम रित्या केलेली आहे.गावामध्ये तंबाखू,गुटखा,सुपारी आणि दारू बंदी आहे.गावामध्ये बचत गटाच्या महिलांकडून,युवक मंडळांकडून आणि शेतकऱ्याकडून नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम चालू राहतात.गावाची १००% कर वसुली आहे.
कचरा व्यवस्थापनासाठी आदर्श घ्यावं असे हे आदर्श राजगड. गावातील प्रत्येक कुटुंबं हे आपला घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवत पर्यायानं संपूर्ण गाव स्वच्छ राहत हा अगदी साधा सोपा नियम.इतक्या साध्या आणि सोप्या नियमावर संपूर्ण गाव स्वच्छतेचे आदर्श उदाहरण बनले आहे.घरगुती स्तरावर कचरा व्यवस्थापनाचा कोणताच प्रश्न नाही. सार्वजनिक स्तरावर कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत ने जागोजागी कचराकुंड्या बसविल्या आहेत.तसेच घंटागाडीतून कचरा गोळा करून तो ग्रामपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये नेला जातो.तिथे प्लास्टिक,धातू,कागदी/कापडी अशा पद्धतीने त्याचे वर्गीकरण केले जाते.त्याचं प्रकल्पामध्ये गांडूळ खत आणि कंपोस्ट खताचा प्रकल्प आहे.गावातील जमा होणाऱ्या कचऱ्यावर व्यवस्थापन करून त्यापासून गांडूळ खत,कंपोस्ट खत बनविले जाते.जी जागा काही वर्षांपूर्वी अस्वच्छतेचे भरलेली होती ती जागा आता ऑक्सिजन पार्कमध्ये /शोभिवंत बगीच्यामध्ये रूपांतरित झालेली आहे .एकंदरीतच प्रत्येक गावाने आणि जे कोणी कचरा व्यवस्थापनावर कार्य करत आहेत संशोधन करत आहेत त्यांनी एकदा तरी या गावाला भेट द्यावी.
(विशेष सहकार्य: रोशन आलम,संगणक परिचालक,ग्रामपंचायत राजगड ,तालुका-मुल, जिल्हा-चंद्रपूर.
प्रेम कासदेकर,रवी अहिरे मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक)
- अतुल संगीता आत्माराम
9527544478
कथा परिवर्तनाची:
'आदर्शगाव राजगड'
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुल तालुक्यापासून २५ किमी अंतरावर असलेलं राजगड हे गाव.गावाला प्राचीन काळापासूनच ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.राजगड म्हणजे गेडाम राजाची भूमी.आजही त्या राजवटीच्या अस्तित्वाच्या खुणा पाहायला मिळतात.चंद्रपूर चे आत्राम राजे आणि राजगड चे गेडाम राजे हे दोन राजघराणे. चंद्रपूर च राजा शक्तीने बलशाली असल्याने त्याने काही काळातच राजगडच्या गेडाम राजाचा पराभव केला.
गावामध्ये मामा तलावात असणारे हेमाडपंथी मंदिर गावाच्या ऐतिहासिक वैभवात अजुनच शोभा आणते.
सौ.हजारे या इथल्या सध्याच्या सरपंच.गावाच्या इतिहासात एकदा अपवाद वगळता २००० सालापासून बिनविरोध निवडणूक होत आहे.२००२ २००३ मध्ये गावाला स्वच्छतेसाठी महाराष्ट्र राज्याच निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला.त्यानंतर पुन्हा २०१६मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला.ग्रामपंचायत मध्ये ग्रामसांसद हॉल मध्ये आतापर्यंत मिळालेलं सगळे पुरस्कार ठेवून आहेत.ते गावाच्या अभिमान वाढवतातच.आता आपण बोलुयात स्वच्छतेविषयी.गावामध्ये मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायत पर्यंत पोचण्यासाठी साधारण १.५ ते २ किमीच्या रस्त्यामध्ये दुतर्फा झाडे आहेत आणि कागदच एक तुकडासुध्दा नजरेस पडणार नाही.जागोजागी सार्वजनिक कचराकुंडी बसविल्या आहेत. सांडपाण्याची व्यवस्था अगदी उत्तम रित्या केलेली आहे.गावामध्ये तंबाखू,गुटखा,सुपारी आणि दारू बंदी आहे.गावामध्ये बचत गटाच्या महिलांकडून,युवक मंडळांकडून आणि शेतकऱ्याकडून नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम चालू राहतात.गावाची १००% कर वसुली आहे.
कचरा व्यवस्थापनासाठी आदर्श घ्यावं असे हे आदर्श राजगड. गावातील प्रत्येक कुटुंबं हे आपला घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवत पर्यायानं संपूर्ण गाव स्वच्छ राहत हा अगदी साधा सोपा नियम.इतक्या साध्या आणि सोप्या नियमावर संपूर्ण गाव स्वच्छतेचे आदर्श उदाहरण बनले आहे.घरगुती स्तरावर कचरा व्यवस्थापनाचा कोणताच प्रश्न नाही. सार्वजनिक स्तरावर कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत ने जागोजागी कचराकुंड्या बसविल्या आहेत.तसेच घंटागाडीतून कचरा गोळा करून तो ग्रामपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये नेला जातो.तिथे प्लास्टिक,धातू,कागदी/कापडी अशा पद्धतीने त्याचे वर्गीकरण केले जाते.त्याचं प्रकल्पामध्ये गांडूळ खत आणि कंपोस्ट खताचा प्रकल्प आहे.गावातील जमा होणाऱ्या कचऱ्यावर व्यवस्थापन करून त्यापासून गांडूळ खत,कंपोस्ट खत बनविले जाते.जी जागा काही वर्षांपूर्वी अस्वच्छतेचे भरलेली होती ती जागा आता ऑक्सिजन पार्कमध्ये /शोभिवंत बगीच्यामध्ये रूपांतरित झालेली आहे .एकंदरीतच प्रत्येक गावाने आणि जे कोणी कचरा व्यवस्थापनावर कार्य करत आहेत संशोधन करत आहेत त्यांनी एकदा तरी या गावाला भेट द्यावी.
(विशेष सहकार्य: रोशन आलम,संगणक परिचालक,ग्रामपंचायत राजगड ,तालुका-मुल, जिल्हा-चंद्रपूर.
प्रेम कासदेकर,रवी अहिरे मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक)
- अतुल संगीता आत्माराम
9527544478
Good
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteछान
ReplyDelete