'सामान्यांतील असामान्य सामाजिक उद्योजक '
'
Uncommon Social Entrepreneur_'
ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे उद्योजकता असू शकते याविषयीचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. ज्याला आपण आजच्या युगामध्ये 'जुगाड तंत्रज्ञान' संबोधतो त्याचा उदय हा ग्रामीण भागात होत असतो.लोकांच्या सुप्त डोक्यातून कल्पना या अशाच उगम पावत आहेत गावागावातून. वास्तविक पाहता ग्रामीण भागातील ही कला जर जतन केली व त्याला चांगल्या पद्धतीने तज्ञांचे मार्गदर्शन घेतलं आणि विपणन साखळी उपलब्ध करून दिली तर आजच्या काळात करोडोंचा व्यवसाय करणारे व्यवसायांच्या यादीत ही जुगाड तंत्रज्ञाने बसतील. चला तर पाहुयात असच एक जुगाड तंत्रज्ञान.
सामाजिक उद्योजक म्हणून हा अवलिया नक्कीच सार्थ ठरतोय .आजच्या काळातील ह्या सामाजिक उद्योजक, उद्योजकता, तंत्रज्ञ, तंत्रज्ञान यासारख्या अवघड वाटणाऱ्या संकल्पना ज्या आहेत तो हा अवलिया प्रत्येक दिवशी जगतो. पण त्याला माहीतच नाही की आजच्या बदलणाऱ्या आणि स्पर्धेच्या युगात याला सामाजिक उद्योजकता आणि स्वतःला सामाजिक उद्योजक म्हणतात. तसं पाहिलं तर हा जो व्यवसाय आहे तो त्यांचा पिढीजात व्यवसाय. भारताच्या इतिहासातील मागास आणि अस्थिर,भटकी जमात म्हणून कदाचित लोकांनी यांना भरपूर विशेषणे लावली असतील. स्वच्छता ,कचरा व्यवस्थापनात आज भारताने कितीतरी योजना अमलात आणल्या ,कितीतरी लोकांना स्वच्छता दुत म्हणून पुरस्कार मिळाला परंतु खरंच स्वच्छता दूत हा पुरस्कार अशाच व्यक्तींना मिळायला हवं. कचरा समजल्या जाणाऱ्या वस्तूंवर प्रक्रिया करून आर्थिक गुजराण करणारा हे कुटुंब नवरा बायको मुलगा आणि पुतण्या असे चौघे जण हा व्यवसाय करताना मी पाहिले .सरकारी दस्तऐवज मध्ये भटकी जमात म्हणून यांची नोंद आहे. आजच्या घडीला या व्यवसायाला कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवायचे आणि त्यांच्या व्यवसायाला काय नाव द्यायचे हा माझ्यासमोरल प्रश्न अनुत्तरितच आहे. जुन्या साड्यांवर प्रक्रिया करणं आणि त्यातून कलात्मक वस्तूंची निर्मिती करणे हा त्यांच्या व्यवसायाचा मूलभूत गाभा. साधारण पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे त्यांच्याजवळील मानवी शक्तीने चालणारे मशीन एवढीच ती काय यांची गुंतवणूक आणि या गुंतवणुकीवर ते लाखो रुपयांचा व्यवसाय करू शकत आहेत.एक जुनी साडी घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्यापासून दोरखंड बनवून देणे हा व्यवसाय ते करतात.प्रत्येक दिवशी नवीन गाव,नवीन लोक अस त्यांचं जीवन. ते जिथे जात होते तेथेच सोबतच त्यांच्या सोबत असणारे ते लहानसे अवजार घेऊन जात.त्यांना गावात जाताच कोणत्याच मार्केटिंग ची गरज नाही.त्यांना पाहताच माऊथ पब्लिसिटी ने संपूर्ण गावात ते आल्याची खबर अगदी काही मिनिटात पोचते. गावातील महिला त्यांच्या घरी असणाऱ्या जुन्या साडी घेऊन येत .जुन्या साड्या फाडून त्यापासून साधारण 20 फूट लांबीचा दोरखंड ते बनवून देत होते .त्यासाठी प्रति साडीला वीस रुपये ते मजुरी म्हणून घेत होते.एका साडी पासून साधारण २०फूट लांब दोरी बनते. मी साधारण २५ -३० मिनिटे तिथे होतो. तेवढ्या कालावधीमध्ये जवळजवळ तीस साड्यांवर प्रक्रिया करून त्यांनी ६०० रुपये कमावले. कुठलीही मार्केटिंगची साधने उपलब्ध नाही ,कुठलाही प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नाही, तरीदेखील ते कुटुंब प्रति दिवशी २००० रुपये कमवत असावेत असा माझा अंदाज.एवढे असून देखील त्यांच्याकडे पाहून त्यांच्या भटक्या जमातीत आजच्या प्रगत 'स्टार्ट अपचा' मागमूस लागेना. हाच व्यवसाय शहरी भागामध्ये असता तर यावर कित्येकांनी कोटीत पैसे कमावले असते.एक इंजिनियर म्हणून आणि सामाजिक उद्योजक म्हणून त्यांचा व्यवसाय आणि तंत्रज्ञान पिढीजात पुढे चालवण्याचा आणि तशाच पद्धतीच्या व्यवसायातून किमान ५-६ लोकांना तरी रोजगार उपलब्ध करून देण्याचा मी मनोमन निश्चय करून तिथून पुढच्या गावी निघालो.
अतुल-9527544478
'
Uncommon Social Entrepreneur_'
ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे उद्योजकता असू शकते याविषयीचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. ज्याला आपण आजच्या युगामध्ये 'जुगाड तंत्रज्ञान' संबोधतो त्याचा उदय हा ग्रामीण भागात होत असतो.लोकांच्या सुप्त डोक्यातून कल्पना या अशाच उगम पावत आहेत गावागावातून. वास्तविक पाहता ग्रामीण भागातील ही कला जर जतन केली व त्याला चांगल्या पद्धतीने तज्ञांचे मार्गदर्शन घेतलं आणि विपणन साखळी उपलब्ध करून दिली तर आजच्या काळात करोडोंचा व्यवसाय करणारे व्यवसायांच्या यादीत ही जुगाड तंत्रज्ञाने बसतील. चला तर पाहुयात असच एक जुगाड तंत्रज्ञान.
सामाजिक उद्योजक म्हणून हा अवलिया नक्कीच सार्थ ठरतोय .आजच्या काळातील ह्या सामाजिक उद्योजक, उद्योजकता, तंत्रज्ञ, तंत्रज्ञान यासारख्या अवघड वाटणाऱ्या संकल्पना ज्या आहेत तो हा अवलिया प्रत्येक दिवशी जगतो. पण त्याला माहीतच नाही की आजच्या बदलणाऱ्या आणि स्पर्धेच्या युगात याला सामाजिक उद्योजकता आणि स्वतःला सामाजिक उद्योजक म्हणतात. तसं पाहिलं तर हा जो व्यवसाय आहे तो त्यांचा पिढीजात व्यवसाय. भारताच्या इतिहासातील मागास आणि अस्थिर,भटकी जमात म्हणून कदाचित लोकांनी यांना भरपूर विशेषणे लावली असतील. स्वच्छता ,कचरा व्यवस्थापनात आज भारताने कितीतरी योजना अमलात आणल्या ,कितीतरी लोकांना स्वच्छता दुत म्हणून पुरस्कार मिळाला परंतु खरंच स्वच्छता दूत हा पुरस्कार अशाच व्यक्तींना मिळायला हवं. कचरा समजल्या जाणाऱ्या वस्तूंवर प्रक्रिया करून आर्थिक गुजराण करणारा हे कुटुंब नवरा बायको मुलगा आणि पुतण्या असे चौघे जण हा व्यवसाय करताना मी पाहिले .सरकारी दस्तऐवज मध्ये भटकी जमात म्हणून यांची नोंद आहे. आजच्या घडीला या व्यवसायाला कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवायचे आणि त्यांच्या व्यवसायाला काय नाव द्यायचे हा माझ्यासमोरल प्रश्न अनुत्तरितच आहे. जुन्या साड्यांवर प्रक्रिया करणं आणि त्यातून कलात्मक वस्तूंची निर्मिती करणे हा त्यांच्या व्यवसायाचा मूलभूत गाभा. साधारण पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे त्यांच्याजवळील मानवी शक्तीने चालणारे मशीन एवढीच ती काय यांची गुंतवणूक आणि या गुंतवणुकीवर ते लाखो रुपयांचा व्यवसाय करू शकत आहेत.एक जुनी साडी घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्यापासून दोरखंड बनवून देणे हा व्यवसाय ते करतात.प्रत्येक दिवशी नवीन गाव,नवीन लोक अस त्यांचं जीवन. ते जिथे जात होते तेथेच सोबतच त्यांच्या सोबत असणारे ते लहानसे अवजार घेऊन जात.त्यांना गावात जाताच कोणत्याच मार्केटिंग ची गरज नाही.त्यांना पाहताच माऊथ पब्लिसिटी ने संपूर्ण गावात ते आल्याची खबर अगदी काही मिनिटात पोचते. गावातील महिला त्यांच्या घरी असणाऱ्या जुन्या साडी घेऊन येत .जुन्या साड्या फाडून त्यापासून साधारण 20 फूट लांबीचा दोरखंड ते बनवून देत होते .त्यासाठी प्रति साडीला वीस रुपये ते मजुरी म्हणून घेत होते.एका साडी पासून साधारण २०फूट लांब दोरी बनते. मी साधारण २५ -३० मिनिटे तिथे होतो. तेवढ्या कालावधीमध्ये जवळजवळ तीस साड्यांवर प्रक्रिया करून त्यांनी ६०० रुपये कमावले. कुठलीही मार्केटिंगची साधने उपलब्ध नाही ,कुठलाही प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नाही, तरीदेखील ते कुटुंब प्रति दिवशी २००० रुपये कमवत असावेत असा माझा अंदाज.एवढे असून देखील त्यांच्याकडे पाहून त्यांच्या भटक्या जमातीत आजच्या प्रगत 'स्टार्ट अपचा' मागमूस लागेना. हाच व्यवसाय शहरी भागामध्ये असता तर यावर कित्येकांनी कोटीत पैसे कमावले असते.एक इंजिनियर म्हणून आणि सामाजिक उद्योजक म्हणून त्यांचा व्यवसाय आणि तंत्रज्ञान पिढीजात पुढे चालवण्याचा आणि तशाच पद्धतीच्या व्यवसायातून किमान ५-६ लोकांना तरी रोजगार उपलब्ध करून देण्याचा मी मनोमन निश्चय करून तिथून पुढच्या गावी निघालो.
अतुल-9527544478
Comments
Post a Comment