Skip to main content
 शोध  सामाजिक उद्योजकतेचा.".
माझ्या वैयक्तिक भेटीतून आणि क्षेत्र अनुभवातून मी पाहिलेल्या 15  असामान्य सामाजिक उद्योजक आणि त्याच्या उद्योगांची शृंखला लिहण्यासाठी सुरुवात करत आहे.हे सर्व उद्योजक आपल्या प्रत्येकाच्याच पाहण्याचे आहेत.परंतु
त्यांच्याप्रती असलेला सामाजिक दृष्टिकोन बदलून त्यांच्याकडे एक माणूस आणि उद्योजक म्हणून पाहून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे अथवा त्यासाठी प्रयत्न करणे हाच या शृंखलेचा उद्देश!

भाग -1: ' मी मूर्तिकार
'असामान्य सामाजिक उद्योजक '

मी अशा व्यक्तीविषयी बोलत आहे जे आपल्या समाजात  'सामाजिक उद्योजक' म्हणून काम करतात आणि त्यांचं काम आहे कचरा व्यवस्थापनाच. तुम्ही आम्ही लोक  दारू पिऊन  ज्या बाटल्या टाकतो  ना त्याची टोपण कुजली जात नाहीत. त्याच टोपणांवर प्रक्रिया करून त्यापासून अप्रतिम आणि सुबक मूर्ती बनविण्याचे काम हा अवलिया करतो. आणि आपल्यासारखे लोक आपल्याच कचऱ्याची त्याच्याकडे असलेल्या जुगाड  टेक्नॉलॉजी  द्वारे सुबक मूर्ती बनवून घेतात.
बुरसटलेले सामाजिक विचारसरणी,कचऱ्याच्या किमतीपेक्षा समाजामध्ये मिळणारी कमी  किंमत हेच ते काय अशा सामाजिक उद्योजकांचे अस्तित्व.
त्याच्या सामाजिक उद्योजकतेचे धडे आयआयएम (IIM) सारख्या विद्यापीठात गिरवले तरी त्या तत्वांची आपल्या विद्यार्थ्यांना सर येणार नाही.असे व्यवसाय जर  शहरी व्यक्तीने शहरी भागात केले तर  त्याला पैसे, मान,इज्जत सगळच मिळेल.खूप सारे पुरस्कार देखील मिळतील.पण अशा उद्योजकांना काय मिळेल?

मी पाहिलेले हेच खरे बेस्ट  'वेस्ट मॅनेजर ' आहेत. कदाचित त्यांना वेस्ट मॅनेजर या व्यक्तीचं काम काय असतं हे सुद्धा माहीत नसेल परंतु त्यांना त्या पदापेक्षा  जास्त स्वच्छाग्रहीच काम हे लोक करत आहेत. आपल्याच समाजाने यांना अतिशय हिनतेची वागणूक देऊन कालबाह्य केलंय. यांचे अस्तित्व ते काय आहे हो आपल्या समाजामध्ये? विकासाच्या नावाखाली कचरा आपण करायचा; चैनीच्या हौस मौजेसाठी दारू दारू पिऊन बाटल्या आपण मोकळे करायचा आणि त्याच बाटल्या यांनी गोळा करायच्या. आणि पुन्हा अस्वच्छतेच्या नावाखाली बोंबा मारायचा!  स्वच्छ भारत अभियानाच्या नावानं मोठमोठ्या योजना राबवून स्वच्छाग्रही म्हणून कित्येकांना पुरस्कार दिले. पण अशा लोकांपैकी एकाला पण मिळाले नाही. मला वाटते हेच खरे स्वच्छतादूत आहेत  आणि यांना काय मिळाले? यांना मिळाला जातीयवादी द्वेष, समाजबाह्य जगणं, उपासमार,गरिबी आणि अत्युच्च हीनतेची वागणूक!
स्वच्छ भारतासाठी  स्टार्ट अप इंडिया सारख्या कित्येक योजना  आणि आणि स्वच्छ तेच्या कित्येक स्टार्ट अप ने बक्षिसे जिंकली लाखोंची,पण यांच्या स्टार्ट अपला काय मिळाले हो..यांच्याकडून यांच्या कष्टाच्या पैशात पण सामान्यांनी आणि पैसेवाल्यांनी  चेंगु पणा दाखवत पैसे कमी करायचे.मी असे नाही पाहिलं  की कोणी व्यक्तीने त्या व्यक्तीला जास्त पैसे दिले अगदी मी सुध्दा.

आता येऊयात मुख्य उद्योजकतेच्या  विषयावर.
व्यवसायावर बोलायचं झाल्यास हा असा व्यवसाय आहे ज्याला आपण टाकाऊ गोष्टींपासून मूर्तीकाम म्हणू शकतो. मी पूर्वी लिहिलेल्या काही ब्लॉग पैकी हा पुन्हा असा  ब्लॉग आहे की या व्यवसायच नाव आणि कॅटागरी काय ते ठरवता येत नाही.हा व्यक्ती दारूच्या बाटल्यांचा टोपनांपासून (साधारण ६०-७०) त्यांना सुबक मूर्ती बनवतो.ती टोपणे तिथेच बनवलेल्या भट्टीमध्ये  (इथेपण जूगाड) टाकून ती वितळवतो. वितळलेले ते मिश्रण साच्यामध्ये टाकून एकावेळी २ ते ३ मूर्ती बनवतो.या सर्व प्रक्रियेला साधारण १५ ते २० मिनिटे लागतात . १५ ते २० मिनिटांच्या वेळात या व्यक्तीने साधारण १५० रुपये कमावले.ही सुध्दा भटकी जमात असून ते गावोगावी फिरून आपली गुजराण करतात.एका दिवसाच गणित जुळवल तर ३००रुपयांची त्यांची दिवसाची कमाई धरली तरी त्यांच  महिन्याकाठी जगण्याचा संघर्षाचं असतो.

आज यांच्या अस्तित्वामुळे कचरा व्यवस्थापन खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने होत आहे.मी तर या लोकांसाठी माझा लहान का होईना प्रयत्न करणार आहेच.शक्य असेल तर तुम्ही सुध्दा करा.
- अतुल संगीता आत्माराम
9527544478


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास ' तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार? माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत. आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत! श...
स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’ PC:www.wildfilmindia.com (देशाचे  मा.पंतप्रधान स्वच्छतेवर खूपच आक्रमक असून नेहमीच त्याबाबत कोणत्या न कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात व्यस्त असतात.हा लेख लिहिण्याचं प्रयत्न मा.पंतप्रधान आणि त्यांच्या स्वच्छताविषयक योजना आणि विचारांनी प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने ‘स्वच्छता दूत’ असणाऱ्या माझ्या साऱ्या भारतातील माता भगिनींना समर्पित. #’स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’# मी सायंकाळी  गॅलरीमध्ये चहा पीत  उभा होतो आणि माझी नजर गलरीमधून सायंकाळच्या होणाऱ्या हालचाली टिपण्यात व्यस्त होती.समोरील एका घरासमोर एक मुलगी अंगण झाडत होती.आणि समोरच्या नालीवर काही तळीराम चार्जिंग होऊन बसले होते.मी मात्र ते दृश्य पाहून स्वच्छतेच्या विचारात व्यस्त झालो. बसलेल्या तळीराम फालतू गोष्टी करण्यासोबतच त्या मुलीकडे पाहून एकमेकांना खुणावत होते.ती मुलगी हाताने झाडू घेऊन झाडत होती आणि दुसऱ्या हाताने आपली इज्जत वर तळीरामच्या नजरेतून वाचवण्यासाठी संघर्ष करत होती.बाजूच्याच दुकानात टीव्हीवर नुकताच मा.देशाच्या पंतप्रधान कडून झालेल्या ‘मन की बात’ वर चर्चा चालू होती.मा....

घनकचरा व्यवस्थापनाचा सुप्त किडा

 टाटा इन्स्टिट्यूट मधून पाणी,स्वछता आणि आरोग्य व्यवस्थापन विषयात पदवी घेऊन  मी युनिसेफ संस्थेसाठी काम करत आहे.जेव्हापासून मी WASH कोर्सला प्रवेश घेतलंय, तेव्हापासून जिथं कुठं  मला घनकचरा दिसतोय-तेव्हा माझ्यातील सुप्त किडा मला नेहमीच आव्हान करत होता. "अरे अतुल,एवढा तुझ्यासमोर कचरा दिसतोय आणि तू काहीच करत नाहीयेस ?" असं बोलल्याप्रमाणे तो मला जणू शह देत होता. माझ्यासह अखिल मानवजात त्यांच्या दैनंदिन जीवनात कोट्यवधी किलोचा कचरा निर्माण करून पृथ्वीवर साठवत आहे.आणि फार कमी लोक त्याच्या व्यवस्थापणासाठी काम करत आहेत.  मी यवतमाळ येथील उमरी गावातील एका संस्थेत मागच्या एक आठवड्यापासून मुक्कामी आहे.येण्याचं प्रयोजन म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. अभियांत्रिकी आणि सामाजिक विज्ञान शास्त्रातील माझ्या पदवीचा उपयोग या ठिकाणी पुरेपूर करून शिक्षण,पोषण आणि पर्यावरण विषयात दखलपात्र काम करता येऊ शकतं का ? याचाच मला अनुभव घ्यायचं आहे. इथे खचाखच भरून असणारा कचरा मला जास्तच अनुभव देत आहे.अगदी निर्जीव गोष्टीदेखील तुम्हाला शिकवत असतात त्याप्रमाणे!  येणाऱ्या काही दिवसांत यावर काय काय फलनिष्पत्ती ...