Skip to main content
 शोध  सामाजिक उद्योजकतेचा.".
माझ्या वैयक्तिक भेटीतून आणि क्षेत्र अनुभवातून मी पाहिलेल्या 15  असामान्य सामाजिक उद्योजक आणि त्याच्या उद्योगांची शृंखला लिहण्यासाठी सुरुवात करत आहे.हे सर्व उद्योजक आपल्या प्रत्येकाच्याच पाहण्याचे आहेत.परंतु
त्यांच्याप्रती असलेला सामाजिक दृष्टिकोन बदलून त्यांच्याकडे एक माणूस आणि उद्योजक म्हणून पाहून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे अथवा त्यासाठी प्रयत्न करणे हाच या शृंखलेचा उद्देश!

भाग -1: ' मी मूर्तिकार
'असामान्य सामाजिक उद्योजक '

मी अशा व्यक्तीविषयी बोलत आहे जे आपल्या समाजात  'सामाजिक उद्योजक' म्हणून काम करतात आणि त्यांचं काम आहे कचरा व्यवस्थापनाच. तुम्ही आम्ही लोक  दारू पिऊन  ज्या बाटल्या टाकतो  ना त्याची टोपण कुजली जात नाहीत. त्याच टोपणांवर प्रक्रिया करून त्यापासून अप्रतिम आणि सुबक मूर्ती बनविण्याचे काम हा अवलिया करतो. आणि आपल्यासारखे लोक आपल्याच कचऱ्याची त्याच्याकडे असलेल्या जुगाड  टेक्नॉलॉजी  द्वारे सुबक मूर्ती बनवून घेतात.
बुरसटलेले सामाजिक विचारसरणी,कचऱ्याच्या किमतीपेक्षा समाजामध्ये मिळणारी कमी  किंमत हेच ते काय अशा सामाजिक उद्योजकांचे अस्तित्व.
त्याच्या सामाजिक उद्योजकतेचे धडे आयआयएम (IIM) सारख्या विद्यापीठात गिरवले तरी त्या तत्वांची आपल्या विद्यार्थ्यांना सर येणार नाही.असे व्यवसाय जर  शहरी व्यक्तीने शहरी भागात केले तर  त्याला पैसे, मान,इज्जत सगळच मिळेल.खूप सारे पुरस्कार देखील मिळतील.पण अशा उद्योजकांना काय मिळेल?

मी पाहिलेले हेच खरे बेस्ट  'वेस्ट मॅनेजर ' आहेत. कदाचित त्यांना वेस्ट मॅनेजर या व्यक्तीचं काम काय असतं हे सुद्धा माहीत नसेल परंतु त्यांना त्या पदापेक्षा  जास्त स्वच्छाग्रहीच काम हे लोक करत आहेत. आपल्याच समाजाने यांना अतिशय हिनतेची वागणूक देऊन कालबाह्य केलंय. यांचे अस्तित्व ते काय आहे हो आपल्या समाजामध्ये? विकासाच्या नावाखाली कचरा आपण करायचा; चैनीच्या हौस मौजेसाठी दारू दारू पिऊन बाटल्या आपण मोकळे करायचा आणि त्याच बाटल्या यांनी गोळा करायच्या. आणि पुन्हा अस्वच्छतेच्या नावाखाली बोंबा मारायचा!  स्वच्छ भारत अभियानाच्या नावानं मोठमोठ्या योजना राबवून स्वच्छाग्रही म्हणून कित्येकांना पुरस्कार दिले. पण अशा लोकांपैकी एकाला पण मिळाले नाही. मला वाटते हेच खरे स्वच्छतादूत आहेत  आणि यांना काय मिळाले? यांना मिळाला जातीयवादी द्वेष, समाजबाह्य जगणं, उपासमार,गरिबी आणि अत्युच्च हीनतेची वागणूक!
स्वच्छ भारतासाठी  स्टार्ट अप इंडिया सारख्या कित्येक योजना  आणि आणि स्वच्छ तेच्या कित्येक स्टार्ट अप ने बक्षिसे जिंकली लाखोंची,पण यांच्या स्टार्ट अपला काय मिळाले हो..यांच्याकडून यांच्या कष्टाच्या पैशात पण सामान्यांनी आणि पैसेवाल्यांनी  चेंगु पणा दाखवत पैसे कमी करायचे.मी असे नाही पाहिलं  की कोणी व्यक्तीने त्या व्यक्तीला जास्त पैसे दिले अगदी मी सुध्दा.

आता येऊयात मुख्य उद्योजकतेच्या  विषयावर.
व्यवसायावर बोलायचं झाल्यास हा असा व्यवसाय आहे ज्याला आपण टाकाऊ गोष्टींपासून मूर्तीकाम म्हणू शकतो. मी पूर्वी लिहिलेल्या काही ब्लॉग पैकी हा पुन्हा असा  ब्लॉग आहे की या व्यवसायच नाव आणि कॅटागरी काय ते ठरवता येत नाही.हा व्यक्ती दारूच्या बाटल्यांचा टोपनांपासून (साधारण ६०-७०) त्यांना सुबक मूर्ती बनवतो.ती टोपणे तिथेच बनवलेल्या भट्टीमध्ये  (इथेपण जूगाड) टाकून ती वितळवतो. वितळलेले ते मिश्रण साच्यामध्ये टाकून एकावेळी २ ते ३ मूर्ती बनवतो.या सर्व प्रक्रियेला साधारण १५ ते २० मिनिटे लागतात . १५ ते २० मिनिटांच्या वेळात या व्यक्तीने साधारण १५० रुपये कमावले.ही सुध्दा भटकी जमात असून ते गावोगावी फिरून आपली गुजराण करतात.एका दिवसाच गणित जुळवल तर ३००रुपयांची त्यांची दिवसाची कमाई धरली तरी त्यांच  महिन्याकाठी जगण्याचा संघर्षाचं असतो.

आज यांच्या अस्तित्वामुळे कचरा व्यवस्थापन खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने होत आहे.मी तर या लोकांसाठी माझा लहान का होईना प्रयत्न करणार आहेच.शक्य असेल तर तुम्ही सुध्दा करा.
- अतुल संगीता आत्माराम
9527544478


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Chapter 1: Understanding Nutrition #Nutrition is an integral component of every individuals life. Even lifestyle decides nutritional development in individuals life.We team of Ignited minds starts to exploring  rural India and will brings you various things in society about nutrition. Stay tuned for next chapter.

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. #आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय. कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे. महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या ...

'मी सक्षम'

रसिका! Ignited Minds चा पडद्यामागील व्यक्तिमत्व! अगदी सुरुवातीच्या काळापासून बोलण्यातून कमी आणि शब्दातून जास्त व्यक्त होणारी व्यक्ती! तिची 'स्व' ला घेऊन महि ला सशक्तीकरणाची कविता. बोलायचय मला मनमोकळ हसायचे मला खळखळून अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारख वहायचे मला भरभरुन तोडायचीत सर्व बंधने जगायचं मला निर्भयाने उडायच मला मनसोक्त त्या उंचावरच्या गरुडा प्रमाणे उन्हातल्या  सावलीत विसावयचं मनाचा डोहात पोहयचं या नभाचा गाभाऱ्यात बिंधास्त रान पाखाराप्रमान भिरभिरायचं गाण्यातील सुराप्रमाने नाचायचं कवितेचा शब्दात रुजायचं या असाह्य जगात वावरताना मला फक्त स्वतःच बनायचं                         - रसिका ननवरे