बहीण म्हणाली मला,चल न दादा फिरायला,
किती दिवस झालं ,बाहेर जायला.
म्हणाली मग ती मला काय रे दादा,तुझी पाखरू कसली भारी हसली आज?
करून येईल का कधी ती तुझ्यासाठी साज?
तुला ती दिसली आणि पाहून हसली , तेव्हापन तुझ्या चेहऱ्यावरची चमक मला दिसली.
अरे दादा,नको करू लेट,
तू थेट जाऊनच भेट,
तिने सांगितलंय मला तिच्या मनाचा 1 कप्पा,
राखून ठेवलाय तुझ्याशी मारायला गप्पा!
बहीण म्हणाली मला, ये दादा,
उद्या जाणार ती गावी,मग तुला बोलण्यासाठी नको का कोणी,
CC ला तू जाशील आणि जाम बोर होशील,
आणि पुन्हा मलाच तुझ्या विरहाच्या कविता ऐकवशील!
मी सांगते त्यापेक्षा ऐक ना दादा,
तिला सांगून टाक ना तुझ्या मनाचा वादा..
माझ्यापुढे डोंगराएवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो,
आणि ती आली की चॉकोलेट सारखा वितळतोस..
सांगून ठेवते तुला, म्हणायचा नाही परत मला,
तिची आठवण येतेय म्हणून!
म्हणाली मग मला दादा तुला सांगू का?
तू म्हणजे चहा न ती म्हणजे कॉफी,
तू म्हणजे ऊन, ती म्हणजे सावली,
तू म्हणजे दिवस ,ती म्हणजे रात्र,
तुमच्या दोघांचं अस्तित्व आहे हे सत्य,
तुम्हाला न बोलायला पाहिजे फक्त निमित्त...
नजरेनं बोलता नि हसून लाजता,
मना-मनातून तुम्ही किती भांडता..
मग म्हणालो मी बहिणीला,
तूच माझी मुक्ताई,
मी तुझा ज्ञानदेव,
सांगणार तर मी तुला ,तिची आठवण येतेय मला,
CC ला जाणार पण बोर नाही होणार,
तू म्हणजे टाळ, आणि मी म्हणजे मृदंग,
तुझ्यासंगे गाईन मी
विठू-माऊलीचे अभंग!
अजून मी म्हटलं माझ्या बहिणीला,
प्रेम म्हणजे काय प्रेमींचच असतं...?
आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा कमीच ते असता...
धन्य ती मुक्ताई आणि धन्य तो ज्ञानोबा!
त्यांचं बंधुप्रेम उभ्या देहांनी पाहिल!.
lay bhari😍👌👌
ReplyDeleteBharu ki
ReplyDelete