Skip to main content
बहीण म्हणाली मला,चल न दादा फिरायला,
किती दिवस झालं ,बाहेर जायला.
म्हणाली मग ती मला काय रे दादा,तुझी पाखरू कसली भारी हसली आज?
करून येईल  का कधी ती तुझ्यासाठी साज?

तुला ती दिसली आणि  पाहून हसली , तेव्हापन तुझ्या चेहऱ्यावरची चमक मला दिसली.
अरे दादा,नको करू लेट,
तू थेट जाऊनच भेट, 
तिने सांगितलंय मला तिच्या मनाचा 1 कप्पा,
राखून ठेवलाय तुझ्याशी मारायला गप्पा!

बहीण म्हणाली मला, ये दादा,
 उद्या जाणार ती गावी,मग तुला बोलण्यासाठी नको का कोणी,
CC ला तू जाशील आणि जाम बोर होशील,
आणि पुन्हा मलाच तुझ्या विरहाच्या कविता ऐकवशील!

मी सांगते त्यापेक्षा ऐक ना दादा,
तिला सांगून टाक ना तुझ्या मनाचा वादा..
माझ्यापुढे डोंगराएवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो,
आणि ती आली की चॉकोलेट सारखा वितळतोस..

सांगून ठेवते तुला, म्हणायचा नाही परत मला,
तिची आठवण येतेय म्हणून!
 म्हणाली मग मला दादा तुला सांगू का? 
  तू म्हणजे चहा न ती म्हणजे कॉफी,
तू म्हणजे ऊन, ती म्हणजे सावली,
 तू म्हणजे दिवस ,ती म्हणजे रात्र,
तुमच्या दोघांचं अस्तित्व आहे हे सत्य,
तुम्हाला न बोलायला पाहिजे फक्त निमित्त...
नजरेनं बोलता नि हसून लाजता,
मना-मनातून तुम्ही किती भांडता..

मग म्हणालो मी बहिणीला,
तूच माझी मुक्ताई,
मी तुझा ज्ञानदेव, 
सांगणार तर मी तुला ,तिची आठवण येतेय मला,
CC ला जाणार पण बोर नाही होणार,

तू म्हणजे टाळ, आणि  मी म्हणजे मृदंग,
तुझ्यासंगे गाईन मी 
विठू-माऊलीचे अभंग!

अजून मी म्हटलं माझ्या बहिणीला, 
प्रेम म्हणजे काय प्रेमींचच असतं...?
आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा कमीच ते असता...
धन्य ती मुक्ताई आणि धन्य तो  ज्ञानोबा!
त्यांचं बंधुप्रेम उभ्या देहांनी पाहिल!.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास ' तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार? माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत. आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत! श...
भाग-2  ' सामाजिक उद्योजकता लोककला आणि कलापथक' समाजामध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी कलापथक यांचे अमूल्य योगदान राहिलेले आहे.ते पारंपरिक कला सादर करतात ज्यातून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन होते. आजच्या घडीला सोशल मीडियाच्या वापराने त्याच्या एवढा प्रभाव कोणत्याच माध्यमाचा नाही. बुरसटलेली विचारसरणी, परंपरागत रुढी यांचा  प्रभाव, नवीन विज्ञानवादी गोष्टींचा विचार करण्याची अपरिहार्यता या सर्व गोष्टी पारंपारिक कला पथक प्रभावी पद्धतीने  सादर करण्याचे काम करत आहे. आज भारतात  संडासांची संख्यापेक्षा मोबाईलची  संख्या जास्त आहे.म्हणजे स्वतःच्या स्वच्छतेपेक्षा तांत्रिक गोष्टींचा वापराला जास्त महत्त्व आहे.म्हणूनच या मोबाईलच्या माध्यमातून इतर पश्चिमात्य गोष्टींचा अगदी सहजतेने प्रवेश होत आहे ज्याच्यामुळे आमचा मेंदुसुद्धा  काम करणं बंद झाला आहे. दिसली मोकळी जागा की मुतणार तिथे, थुंकनार तिथे,कचरा पण टाकणार तिथे...मग राहत ते काय? आणि याच गोष्टीमुळे आज  हागण्या-मुतण्यावर ,कचरा ,आणि स्वच्छतेवर या लोकांना प्रबोधन करण्याची वेळ येत आहे. नविन मूल्यांची उपयोगित...
पोटाची भूक भागवायला निघालेलं हे दुकान,आणि जिभेसाठीच माझा हट्ट,आणि त्यासाठीची प्रतीक्षा।पिढ्यानपिढ्या चालेलला हा भावनेचा भार।आजोबा आणि,नातू,जीवन पट दर्शवते आज। सामोरंच अदृष्य दृश्य पण नवीन पिढीला  देताय जून्या कलेचे शिक्षण।निरीक्षणाचा खेळ हा...घेत आहे धडे,समोर येणाऱ्या प्रश्नाचे।अवगत होत आहेंत नवीन कला,त्या पिढ्यानपिढ्या येणाऱ्या घटकास।बदलेल ही पिढी पण हट्ट मात्र असनार त्या जिभेच्या  चविचा।