Skip to main content
"पुन्हा एकदा मासिक पाळीवर बोलू काही-सुसंवाद दोघांशी"
समाजामध्ये आज कचऱ्याची  जी व्याख्या आहे तीच व्याख्या 'मासिक पाळी व्यवस्थापन ' विषयी आहे.
कचऱ्याला कचरा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात झाली तसेच मासिक पाळी या विषयवार बोलणं सुरुवात झालं हेच महत्वाचं.येणाऱ्या काळात महिलांच्या आरोग्याविषयी आणि पर्यायाने सामाजिक आरोग्याविषयी यामध्ये मानसिक ,शारीरिक आरोग्य आलेच हा! समाजामध्ये या बाबतीत सकारात्मक बदल घडूनच येत राहावं हीच अपेक्षा.
साधारण दीड वर्षापूर्वी विदर्भात एका गावात मी समाजकार्य महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या साहाय्याने एक सर्वेक्षण केलं होत, ज्यात अस आढळून  आला होत की गावामधील ८०% महिला जे मासिक पाळीदरम्यान कापडाच वापर करतात ते धुवून सावलीत  आणि अंधाऱ्या जागी वाळण्याला घालतात जे की पूर्णपणे आरोग्यास अपायकारक आहे.तसेच या बाबतीत म्हणावी तशी जागरूकता नाही आहे.
दुसरा सर्वेक्षण मी मागील महिन्यात केलं ते हे की मुलींमध्ये  सनिटरी नॅपकिन वापरण्याविषयी जाणीव जागृती आहे परंतु त्याच सुरक्षित विल्हेवाट व व्यवस्थापन करणे  याबाबत जाणीव जागरूकता म्हणावी तशी नाहीय.
एक महिला ,मुलगी म्हणून  याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि एक पुरुष म्हणून याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातच खूप मोठी तफावत आहे.लैंगिक शिक्षणाच अभाव,त्या शिक्षणाबाबत   सर्वच स्तरातील अनास्था,पुरुषांचे महिलांच्या आरोग्याबद्दलच्या समस्यांचे गैरसमजूत आणि महिलेकडे केवळ भोगाची वस्तू बघण्याचा दृष्टिकोन याच गोष्टी आजपर्यंत मासिक पाळी व्यवस्थापनात कमी पडत आल्या होत्या.पुरुष आणि स्त्री या दोघांची परस्परांविषयी सहकार्याची भूमिका अपेक्षित   आहे. गेल्या काही वर्षात यात समाधानकारक बदल घडून येत असून मासिक पाळी व्यवस्थापन यासारख्या विष यावर जाहीररीत्या बोलले जात आहे,जाणीवजागृती उपक्रम विविध कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.याच  अपेक्षित परिणाम असा होत आहे की महिलांचा त्यांच्या जीवनातील तसेच समाजातील स्थान प्रभावीपणे अधोरेखित होत आहे.परिणामी महिला त्यांच्या आरोग्याची आता अधिक जबाबदारीने काळजी घेत आहे.

महिलांनी महिलांच्या मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर काम करण्याचीच काही वर्षांपर्यंत अनास्था होती.श्री. अरूनाचलं मुरुगन सारख्या पुरुषाने महिलांच्या मासिक व्यवस्थापनावर आधारित सामाजिक उद्योजकतेचे मॉडेल उभारलेच आहे.परंतु यासारख्या क्लिष्ट विषयावर काम करताना त्यांना घरातूनच किती संघर्ष करावं लागलं याच किंमत फक्त तेच जाणून घेऊ शकतात.पुरुषांच्या,स्त्रियांच्या  मर्यादा या विषयी काम करताना पावला पावलांवर अधोरेखित होत आहेत.
या महिला सबलीकरणाच्या गप्पा मारणे खूप खूप सोप्प असतय,अवघड असते ते त्यावर काम करणे.आज समाजामध्ये  महिला सबलीकरणाचा बाष्कळ गप्पा मारणारे  आणि स्वतच्या आयुष्यात महिलांचा अनादर करणारे कित्येक नमुने पाहायला मिळतात.पण त्याचबरोबर  अरूनाचालन मुरुगन ,सचिन आशा सुभाष यांच्यासारखे  लोकसुद्धा आहेत जे की महिलांच्या विषयामध्ये 'पुरुष'असून सुध्दा काम करत आहेत आणि एकप्रकारे लैंगिक समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आता या लेखावर 'महिला' या शब्दांवर 'जेंडर' सारख्या विशेषणे घेऊन टीका करणारे आणि भाषणे करणारे खूप आहेत.पण जे मी शिकतो त्याचा खरच फिल्ड वर तशा पद्धतीचा प्रभाव पडून येवू शकतो का  हे  पडताळून पाहणं पण महत्वाचं आहे.मासिक पाळी व्यवस्थापनामध्ये आजपर्यंत बऱ्याच संस्था काम करत आहेत. मासिक पाळी यासारख्या क्लिष्ट विषयावरती आज पर्यंत बहुतेकांनी विषय काढताच दुर्लक्ष करण्याचा अथवा त्या विषयावरील पळ काढण्याचा पवित्रा घेतलेला आहे. वास्तविक पाहता हा विषय महिलांच्या पर्यायाने समुदायाच्या दृष्टीने चर्चिला जाण्याचा  आणि शस्वत मार्ग काढण्याचा विषय आहे.एकीकडे महिलांच्या मासिक पाळी व्यवस्थापन जागृती कार्यक्रम करत असतानाच sanitary Pads मुळे होणाऱ्या कचऱ्याचे विल्हेवाट लावणं आणि त्याचा पर्यावरणावरील दुष्परिणामांची शास्त्रज्ञ चिंतित आहेत.एक पुरुष म्हणून महिलांच्या मासिक पाळी व्यवस्थापनामध्ये पुरुषांमध्ये जाणीवजागृती करण्याचा प्रयत्न मागील आठवड्यात केला.योग्य शास्त्रीय दृष्टिकोन आणि समजूतदारपणा हाच पुरुषांकडून समुदाय पातळीवर मासिक पाळी व्यवस्थापन करण्यात यशस्वी करण्याच्या गुरुकिल्ली ठरणार आहेत.
या क्लिष्ट विषयात काम करण्यास जी आम्ही सुरुवात केली आहे त्यात योग्य वेळी योग्य बदल करून अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करून सामाजिक आरोग्य सुधारण्याचा नक्कीच छोटा प्रयत्न करू.
-अतुल संगीता आत्माराम
9527544478






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Chapter 1: Understanding Nutrition #Nutrition is an integral component of every individuals life. Even lifestyle decides nutritional development in individuals life.We team of Ignited minds starts to exploring  rural India and will brings you various things in society about nutrition. Stay tuned for next chapter.

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. #आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय. कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे. महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या ...

'मी सक्षम'

रसिका! Ignited Minds चा पडद्यामागील व्यक्तिमत्व! अगदी सुरुवातीच्या काळापासून बोलण्यातून कमी आणि शब्दातून जास्त व्यक्त होणारी व्यक्ती! तिची 'स्व' ला घेऊन महि ला सशक्तीकरणाची कविता. बोलायचय मला मनमोकळ हसायचे मला खळखळून अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारख वहायचे मला भरभरुन तोडायचीत सर्व बंधने जगायचं मला निर्भयाने उडायच मला मनसोक्त त्या उंचावरच्या गरुडा प्रमाणे उन्हातल्या  सावलीत विसावयचं मनाचा डोहात पोहयचं या नभाचा गाभाऱ्यात बिंधास्त रान पाखाराप्रमान भिरभिरायचं गाण्यातील सुराप्रमाने नाचायचं कवितेचा शब्दात रुजायचं या असाह्य जगात वावरताना मला फक्त स्वतःच बनायचं                         - रसिका ननवरे