Skip to main content
"पुन्हा एकदा मासिक पाळीवर बोलू काही-सुसंवाद दोघांशी"
समाजामध्ये आज कचऱ्याची  जी व्याख्या आहे तीच व्याख्या 'मासिक पाळी व्यवस्थापन ' विषयी आहे.
कचऱ्याला कचरा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात झाली तसेच मासिक पाळी या विषयवार बोलणं सुरुवात झालं हेच महत्वाचं.येणाऱ्या काळात महिलांच्या आरोग्याविषयी आणि पर्यायाने सामाजिक आरोग्याविषयी यामध्ये मानसिक ,शारीरिक आरोग्य आलेच हा! समाजामध्ये या बाबतीत सकारात्मक बदल घडूनच येत राहावं हीच अपेक्षा.
साधारण दीड वर्षापूर्वी विदर्भात एका गावात मी समाजकार्य महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या साहाय्याने एक सर्वेक्षण केलं होत, ज्यात अस आढळून  आला होत की गावामधील ८०% महिला जे मासिक पाळीदरम्यान कापडाच वापर करतात ते धुवून सावलीत  आणि अंधाऱ्या जागी वाळण्याला घालतात जे की पूर्णपणे आरोग्यास अपायकारक आहे.तसेच या बाबतीत म्हणावी तशी जागरूकता नाही आहे.
दुसरा सर्वेक्षण मी मागील महिन्यात केलं ते हे की मुलींमध्ये  सनिटरी नॅपकिन वापरण्याविषयी जाणीव जागृती आहे परंतु त्याच सुरक्षित विल्हेवाट व व्यवस्थापन करणे  याबाबत जाणीव जागरूकता म्हणावी तशी नाहीय.
एक महिला ,मुलगी म्हणून  याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि एक पुरुष म्हणून याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातच खूप मोठी तफावत आहे.लैंगिक शिक्षणाच अभाव,त्या शिक्षणाबाबत   सर्वच स्तरातील अनास्था,पुरुषांचे महिलांच्या आरोग्याबद्दलच्या समस्यांचे गैरसमजूत आणि महिलेकडे केवळ भोगाची वस्तू बघण्याचा दृष्टिकोन याच गोष्टी आजपर्यंत मासिक पाळी व्यवस्थापनात कमी पडत आल्या होत्या.पुरुष आणि स्त्री या दोघांची परस्परांविषयी सहकार्याची भूमिका अपेक्षित   आहे. गेल्या काही वर्षात यात समाधानकारक बदल घडून येत असून मासिक पाळी व्यवस्थापन यासारख्या विष यावर जाहीररीत्या बोलले जात आहे,जाणीवजागृती उपक्रम विविध कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.याच  अपेक्षित परिणाम असा होत आहे की महिलांचा त्यांच्या जीवनातील तसेच समाजातील स्थान प्रभावीपणे अधोरेखित होत आहे.परिणामी महिला त्यांच्या आरोग्याची आता अधिक जबाबदारीने काळजी घेत आहे.

महिलांनी महिलांच्या मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर काम करण्याचीच काही वर्षांपर्यंत अनास्था होती.श्री. अरूनाचलं मुरुगन सारख्या पुरुषाने महिलांच्या मासिक व्यवस्थापनावर आधारित सामाजिक उद्योजकतेचे मॉडेल उभारलेच आहे.परंतु यासारख्या क्लिष्ट विषयावर काम करताना त्यांना घरातूनच किती संघर्ष करावं लागलं याच किंमत फक्त तेच जाणून घेऊ शकतात.पुरुषांच्या,स्त्रियांच्या  मर्यादा या विषयी काम करताना पावला पावलांवर अधोरेखित होत आहेत.
या महिला सबलीकरणाच्या गप्पा मारणे खूप खूप सोप्प असतय,अवघड असते ते त्यावर काम करणे.आज समाजामध्ये  महिला सबलीकरणाचा बाष्कळ गप्पा मारणारे  आणि स्वतच्या आयुष्यात महिलांचा अनादर करणारे कित्येक नमुने पाहायला मिळतात.पण त्याचबरोबर  अरूनाचालन मुरुगन ,सचिन आशा सुभाष यांच्यासारखे  लोकसुद्धा आहेत जे की महिलांच्या विषयामध्ये 'पुरुष'असून सुध्दा काम करत आहेत आणि एकप्रकारे लैंगिक समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आता या लेखावर 'महिला' या शब्दांवर 'जेंडर' सारख्या विशेषणे घेऊन टीका करणारे आणि भाषणे करणारे खूप आहेत.पण जे मी शिकतो त्याचा खरच फिल्ड वर तशा पद्धतीचा प्रभाव पडून येवू शकतो का  हे  पडताळून पाहणं पण महत्वाचं आहे.मासिक पाळी व्यवस्थापनामध्ये आजपर्यंत बऱ्याच संस्था काम करत आहेत. मासिक पाळी यासारख्या क्लिष्ट विषयावरती आज पर्यंत बहुतेकांनी विषय काढताच दुर्लक्ष करण्याचा अथवा त्या विषयावरील पळ काढण्याचा पवित्रा घेतलेला आहे. वास्तविक पाहता हा विषय महिलांच्या पर्यायाने समुदायाच्या दृष्टीने चर्चिला जाण्याचा  आणि शस्वत मार्ग काढण्याचा विषय आहे.एकीकडे महिलांच्या मासिक पाळी व्यवस्थापन जागृती कार्यक्रम करत असतानाच sanitary Pads मुळे होणाऱ्या कचऱ्याचे विल्हेवाट लावणं आणि त्याचा पर्यावरणावरील दुष्परिणामांची शास्त्रज्ञ चिंतित आहेत.एक पुरुष म्हणून महिलांच्या मासिक पाळी व्यवस्थापनामध्ये पुरुषांमध्ये जाणीवजागृती करण्याचा प्रयत्न मागील आठवड्यात केला.योग्य शास्त्रीय दृष्टिकोन आणि समजूतदारपणा हाच पुरुषांकडून समुदाय पातळीवर मासिक पाळी व्यवस्थापन करण्यात यशस्वी करण्याच्या गुरुकिल्ली ठरणार आहेत.
या क्लिष्ट विषयात काम करण्यास जी आम्ही सुरुवात केली आहे त्यात योग्य वेळी योग्य बदल करून अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करून सामाजिक आरोग्य सुधारण्याचा नक्कीच छोटा प्रयत्न करू.
-अतुल संगीता आत्माराम
9527544478






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास ' तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार? माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत. आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत! श...
भाग-2  ' सामाजिक उद्योजकता लोककला आणि कलापथक' समाजामध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी कलापथक यांचे अमूल्य योगदान राहिलेले आहे.ते पारंपरिक कला सादर करतात ज्यातून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन होते. आजच्या घडीला सोशल मीडियाच्या वापराने त्याच्या एवढा प्रभाव कोणत्याच माध्यमाचा नाही. बुरसटलेली विचारसरणी, परंपरागत रुढी यांचा  प्रभाव, नवीन विज्ञानवादी गोष्टींचा विचार करण्याची अपरिहार्यता या सर्व गोष्टी पारंपारिक कला पथक प्रभावी पद्धतीने  सादर करण्याचे काम करत आहे. आज भारतात  संडासांची संख्यापेक्षा मोबाईलची  संख्या जास्त आहे.म्हणजे स्वतःच्या स्वच्छतेपेक्षा तांत्रिक गोष्टींचा वापराला जास्त महत्त्व आहे.म्हणूनच या मोबाईलच्या माध्यमातून इतर पश्चिमात्य गोष्टींचा अगदी सहजतेने प्रवेश होत आहे ज्याच्यामुळे आमचा मेंदुसुद्धा  काम करणं बंद झाला आहे. दिसली मोकळी जागा की मुतणार तिथे, थुंकनार तिथे,कचरा पण टाकणार तिथे...मग राहत ते काय? आणि याच गोष्टीमुळे आज  हागण्या-मुतण्यावर ,कचरा ,आणि स्वच्छतेवर या लोकांना प्रबोधन करण्याची वेळ येत आहे. नविन मूल्यांची उपयोगित...
पोटाची भूक भागवायला निघालेलं हे दुकान,आणि जिभेसाठीच माझा हट्ट,आणि त्यासाठीची प्रतीक्षा।पिढ्यानपिढ्या चालेलला हा भावनेचा भार।आजोबा आणि,नातू,जीवन पट दर्शवते आज। सामोरंच अदृष्य दृश्य पण नवीन पिढीला  देताय जून्या कलेचे शिक्षण।निरीक्षणाचा खेळ हा...घेत आहे धडे,समोर येणाऱ्या प्रश्नाचे।अवगत होत आहेंत नवीन कला,त्या पिढ्यानपिढ्या येणाऱ्या घटकास।बदलेल ही पिढी पण हट्ट मात्र असनार त्या जिभेच्या  चविचा।