Skip to main content
Field Diary':
कथा परिवर्तनाची:
'आदर्शगाव राजगड'
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुल तालुक्यापासून  २५ किमी अंतरावर असलेलं राजगड हे गाव.गावाला प्राचीन काळापासूनच ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.राजगड म्हणजे गेडाम राजाची भूमी.आजही त्या राजवटीच्या अस्तित्वाच्या खुणा पाहायला मिळतात.चंद्रपूर चे आत्राम राजे आणि  राजगड चे गेडाम राजे हे दोन राजघराणे. चंद्रपूर च राजा शक्तीने बलशाली असल्याने त्याने काही काळातच राजगडच्या गेडाम राजाचा पराभव केला.
गावामध्ये  मामा तलावात असणारे हेमाडपंथी मंदिर गावाच्या ऐतिहासिक वैभवात अजुनच शोभा आणते.
सौ.हजारे या इथल्या सध्याच्या सरपंच.गावाच्या इतिहासात एकदा अपवाद वगळता २००० सालापासून  बिनविरोध निवडणूक होत आहे.२००२ २००३  मध्ये गावाला  स्वच्छतेसाठी महाराष्ट्र राज्याच निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला.त्यानंतर पुन्हा २०१६मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला.ग्रामपंचायत मध्ये ग्रामसांसद हॉल मध्ये  आतापर्यंत मिळालेलं सगळे पुरस्कार ठेवून आहेत.ते गावाच्या अभिमान वाढवतातच.आता आपण बोलुयात स्वच्छतेविषयी.गावामध्ये मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायत पर्यंत पोचण्यासाठी साधारण १.५ ते २ किमीच्या रस्त्यामध्ये दुतर्फा झाडे आहेत आणि कागदच एक तुकडासुध्दा नजरेस पडणार नाही.जागोजागी सार्वजनिक कचराकुंडी बसविल्या आहेत. सांडपाण्याची व्यवस्था अगदी उत्तम रित्या केलेली आहे.गावामध्ये तंबाखू,गुटखा,सुपारी आणि दारू बंदी आहे.गावामध्ये बचत गटाच्या महिलांकडून,युवक मंडळांकडून आणि शेतकऱ्याकडून नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम चालू राहतात.गावाची १००% कर वसुली आहे.
कचरा व्यवस्थापनासाठी आदर्श घ्यावं असे हे आदर्श राजगड. गावातील प्रत्येक कुटुंबं हे आपला घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवत पर्यायानं संपूर्ण गाव स्वच्छ राहत हा अगदी साधा सोपा नियम.इतक्या साध्या आणि सोप्या नियमावर संपूर्ण गाव स्वच्छतेचे आदर्श उदाहरण बनले आहे.घरगुती स्तरावर कचरा व्यवस्थापनाचा कोणताच प्रश्न नाही. सार्वजनिक स्तरावर कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत ने जागोजागी कचराकुंड्या बसविल्या आहेत.तसेच घंटागाडीतून कचरा गोळा करून तो ग्रामपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये नेला जातो.तिथे प्लास्टिक,धातू,कागदी/कापडी अशा पद्धतीने त्याचे वर्गीकरण केले जाते.त्याचं प्रकल्पामध्ये गांडूळ खत आणि कंपोस्ट खताचा प्रकल्प आहे.गावातील जमा होणाऱ्या कचऱ्यावर व्यवस्थापन करून त्यापासून गांडूळ खत,कंपोस्ट खत बनविले जाते.जी जागा काही वर्षांपूर्वी अस्वच्छतेचे भरलेली होती ती जागा आता ऑक्सिजन पार्कमध्ये /शोभिवंत बगीच्यामध्ये रूपांतरित झालेली आहे .एकंदरीतच प्रत्येक गावाने आणि जे कोणी कचरा व्यवस्थापनावर कार्य करत आहेत संशोधन करत आहेत त्यांनी एकदा तरी  या गावाला भेट द्यावी.
(विशेष सहकार्य: रोशन आलम,संगणक परिचालक,ग्रामपंचायत राजगड ,तालुका-मुल, जिल्हा-चंद्रपूर.
प्रेम कासदेकर,रवी अहिरे मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक)
- अतुल संगीता आत्माराम
9527544478


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास ' तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार? माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत. आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत! श...
भाग-2  ' सामाजिक उद्योजकता लोककला आणि कलापथक' समाजामध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी कलापथक यांचे अमूल्य योगदान राहिलेले आहे.ते पारंपरिक कला सादर करतात ज्यातून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन होते. आजच्या घडीला सोशल मीडियाच्या वापराने त्याच्या एवढा प्रभाव कोणत्याच माध्यमाचा नाही. बुरसटलेली विचारसरणी, परंपरागत रुढी यांचा  प्रभाव, नवीन विज्ञानवादी गोष्टींचा विचार करण्याची अपरिहार्यता या सर्व गोष्टी पारंपारिक कला पथक प्रभावी पद्धतीने  सादर करण्याचे काम करत आहे. आज भारतात  संडासांची संख्यापेक्षा मोबाईलची  संख्या जास्त आहे.म्हणजे स्वतःच्या स्वच्छतेपेक्षा तांत्रिक गोष्टींचा वापराला जास्त महत्त्व आहे.म्हणूनच या मोबाईलच्या माध्यमातून इतर पश्चिमात्य गोष्टींचा अगदी सहजतेने प्रवेश होत आहे ज्याच्यामुळे आमचा मेंदुसुद्धा  काम करणं बंद झाला आहे. दिसली मोकळी जागा की मुतणार तिथे, थुंकनार तिथे,कचरा पण टाकणार तिथे...मग राहत ते काय? आणि याच गोष्टीमुळे आज  हागण्या-मुतण्यावर ,कचरा ,आणि स्वच्छतेवर या लोकांना प्रबोधन करण्याची वेळ येत आहे. नविन मूल्यांची उपयोगित...
पोटाची भूक भागवायला निघालेलं हे दुकान,आणि जिभेसाठीच माझा हट्ट,आणि त्यासाठीची प्रतीक्षा।पिढ्यानपिढ्या चालेलला हा भावनेचा भार।आजोबा आणि,नातू,जीवन पट दर्शवते आज। सामोरंच अदृष्य दृश्य पण नवीन पिढीला  देताय जून्या कलेचे शिक्षण।निरीक्षणाचा खेळ हा...घेत आहे धडे,समोर येणाऱ्या प्रश्नाचे।अवगत होत आहेंत नवीन कला,त्या पिढ्यानपिढ्या येणाऱ्या घटकास।बदलेल ही पिढी पण हट्ट मात्र असनार त्या जिभेच्या  चविचा।